शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी?

By संतोष येलकर | Updated: March 10, 2024 18:19 IST

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण

संतोष येलकर, अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, ग्रामीण भागातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ५१८ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दोन महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५० उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून, तापत्या उन्हात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली असताना पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित उपाययोजनांची कामे पूर्ण होणे अद्याप बाकी असल्याने, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार कधी आणि पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रशासकीय मान्यता ४८ उपाययोजनांना; ३२ कामे पूर्ण !

४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी यंत्रणांच्या प्रस्तावानुसार आतापर्यंत ४८ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्ंत ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत ३२ कामे!

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४८ उपाययोजनांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३० कुपनलिकांसह एक विंधन विहीर व एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाणीटंचाईची समस्या आणखी होणार तीव्र?

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापत्या उन्हासोबतच विविध गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, त्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईइची तीव्रता आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला