शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी?

By संतोष येलकर | Updated: March 10, 2024 18:19 IST

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण

संतोष येलकर, अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, ग्रामीण भागातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ५१८ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दोन महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५० उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून, तापत्या उन्हात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली असताना पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित उपाययोजनांची कामे पूर्ण होणे अद्याप बाकी असल्याने, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार कधी आणि पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रशासकीय मान्यता ४८ उपाययोजनांना; ३२ कामे पूर्ण !

४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी यंत्रणांच्या प्रस्तावानुसार आतापर्यंत ४८ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्ंत ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत ३२ कामे!

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४८ उपाययोजनांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३० कुपनलिकांसह एक विंधन विहीर व एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाणीटंचाईची समस्या आणखी होणार तीव्र?

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापत्या उन्हासोबतच विविध गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, त्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईइची तीव्रता आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला