शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी?

By संतोष येलकर | Updated: March 10, 2024 18:19 IST

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण

संतोष येलकर, अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, ग्रामीण भागातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ५१८ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दोन महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५० उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून, तापत्या उन्हात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली असताना पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित उपाययोजनांची कामे पूर्ण होणे अद्याप बाकी असल्याने, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार कधी आणि पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रशासकीय मान्यता ४८ उपाययोजनांना; ३२ कामे पूर्ण !

४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी यंत्रणांच्या प्रस्तावानुसार आतापर्यंत ४८ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्ंत ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत ३२ कामे!

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४८ उपाययोजनांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३० कुपनलिकांसह एक विंधन विहीर व एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाणीटंचाईची समस्या आणखी होणार तीव्र?

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापत्या उन्हासोबतच विविध गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, त्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईइची तीव्रता आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला