शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके; उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी?

By संतोष येलकर | Updated: March 10, 2024 18:19 IST

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण

संतोष येलकर, अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, ग्रामीण भागातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ५१८ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दोन महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील २३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५० उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून, तापत्या उन्हात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली असताना पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांपैकी ९ मार्चपर्यंत केवळ ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित उपाययोजनांची कामे पूर्ण होणे अद्याप बाकी असल्याने, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार कधी आणि पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रशासकीय मान्यता ४८ उपाययोजनांना; ३२ कामे पूर्ण !

४ कोटी ५० लाख ९७ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी यंत्रणांच्या प्रस्तावानुसार आतापर्यंत ४८ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्ंत ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत ३२ कामे!

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४८ उपाययोजनांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ३२ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ३० कुपनलिकांसह एक विंधन विहीर व एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पाणीटंचाईची समस्या आणखी होणार तीव्र?

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापत्या उन्हासोबतच विविध गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, त्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईइची तीव्रता आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला