शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पाण्यात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ ...

पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ लोकांना जीवनदान दिले सात तासांच्या कालावधीत दोनद नाला, आमराई नाला, खोलेश्वर स्मशानभूमी विद्रुपा नदी येथील ठीकाणी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

महपालिकेच्या नियाेजनाचे पितळ उघडे? सत्ताधारी म्हणतात प्रशासनाचे अपयश मान्सूनपूर्व नालासफाईची कामे व्यवस्थित न झाल्याचे बुधवारच्या पावसाने उघड केले. शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले, अनेक शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याने लाखाे रुपयांचा माल भिजला, गुरुवारी दिवसभर माेटारपंप लावून हे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू हाेते. महापालिकेचे आपत्तीव्यवस्थापन कुठेही दिसून आले नाही दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने नियाेजनात प्रशासन अपयशी पडल्याचे खापर फाेडले आहे. भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अकोला महानगरपालिकेचे महापौर व पदाधिकारी यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरात पावसामुळे होणारे नुकसान, आपत्कालीन व व्यवस्थेसंदर्भात नियोजन करण्यासंबंधी निर्देश दिले होते, परंतु मनपा प्रशासनाने दाखल घेतली नाही.

आपत्ती नियाेजनात प्रशासन नापास, जिल्हाधिकाऱ्यांसह सिईओही अमरावतीत संपूर्ण जिल्हाभरात पावसाने थैमान घातल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी व प्रशासनाची बेफिकिरी समाेर आली. दुसरीकडे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, असे उच्चपदस्थ अधिकारी जिल्ह्याठिकाणी उपस्थित नव्हते हे सर्व अधिकारी आयुक्तांनी बाेलाविलेल्या बैठकीसाठी निघून गेले हाेते. या परिसरात सर्वाधिक हानी गीतानगर, आझाद कोलोनी, अंबिकानगर, कृषीनगर, खेताननगर, खडकी परिसर, मलकापूर, आश्रयनगर, लक्ष्मीनगर, शिवसेना वसाहत, नवीन किराणा बाजार व शहराच्या इतर भागांमध्ये ३ ते ५ फुटांपर्यंत जलाशय निर्माण झाला व अनेक वाहने व घरांचे नुकसान झाले. जवळपास अकोला शहरातील १५ हजार घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच ग्रामीण भागातील आपातापा, हातरून, रिधोरा, खडकी, डोंगरगाव, दालंबी, व्याळासह १०० गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.