शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बालवाडीचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय गटनेता एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:07 IST

अकोला : महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने ...

अकोला: महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे चित्र समोर आले. खुद्द सत्तापक्ष भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघाच्या गटनेत्यांनी तसेच उपमहापौर वैशाली शेळके यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून येत्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.शहरातील गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील महागडे शिक्षण घेणे परवडत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्यासोबतच त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी ३३ सेविका व ३३ मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती केली होती. २०१७ मध्ये सुरू झालेल्या बालवाडीच्या वर्गांना सर्वसामान्य अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. २०१८ मध्ये संबंधित सेविका, मदतनीस यांना मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मनपा शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण करण्याचे निर्देश बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले. त्यानुषंगाने बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार असल्याचे समोर आले. मनपाच्या संपूर्ण ३३ शाळांमध्ये अंगणवाडी सुरू होणार असल्याची मनपा प्रशासनाला अपेक्षा असल्याने बालवाडीच्या वर्गांवरील सेविका व मदतनीस यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी, आपसूकच बालवाडीचे वर्ग बंद झाले. त्यानंतर अंगणवाडीच्या प्रस्तावाला खीळ बसली. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले असता, या मुद्यावर सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे दिसून आले.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा!उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे गटनेता राहुल देशमुख, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी मनपाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सकारात्मक विचार करावा, असे पत्राद्वारे नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका