शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

पावसात ‘बाप्पा मोरया’चा गजर

By admin | Updated: September 18, 2015 01:02 IST

अकोला जिल्ह्यात श्रींचे जल्लोषात आगमन; पारंपरिक वाद्यांनी दुमदुमले शहर.

अकोला: अधून-मधून कोसळणारा पाऊस, पायाखाली चिखल अन् गुलालाची उधळण करून ह्यबाप्पा मोरयाह्णच्या गजरात श्रींचे राजराजेश्‍वर नगरासह जिल्ह्यात गुरुवारी जल्लोषात आगमन झाले. श्रींच्या स्वागतासाठी जिल्ह्याभर चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत तसेच महिलांचाही उत्साहात सहभाग दिसून आला. गुरुवारी वरुण राजाने राजराजेश्‍वर नगरासह जिल्ह्यात सकाळपासूनच हजेरी लावून श्रींचे स्वागत केले. पावसाच्या सरी आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. या भक्तिमय वातावरणात गुलालाची उधळण करून ह्यबाप्पा मोरयाह्णच्या जयघोषाने अकोलेकरांनी मोठय़ा उत्साहात बाप्पांचे स्वागत केले. मागील दोन दिवसांपासून शहरातील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानामध्ये श्रींच्या मूर्ती विक्रीची बाजारपेठ सजली होती. पावसामुळे बाजारपेठेत सर्वत्र चिखल अन् डबके साचल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती; परंतु पावसातही नागरिकांचा उत्साह वाढत असल्याने बाजारपेठेला नवचैतन्य प्राप्त झाले. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच ढोल ताशांच्या निनादात श्रींचे आगमन केले. पावसामुळे श्रींची मूर्ती ओली होऊ नये म्हणून नागरिकांनी प्लास्टिकचा सहारा घेतल्याचे चित्र दिसून आले. तसेच शहरासह जवळपासच्या ग्रामीण भागातील नागरिकही एसटी बसमध्ये श्रींची मूर्ती नेताना दिसून आले. महिलांचा सहभाग लक्षणीय यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत चिमुकली मुले, वृद्धांसह महिला वर्गातही उत्साह दिसून आला. घरगुती गणेशाच्या स्वागतासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही यंदा महिलांचा सहभाग दिसून आला.

*वाहतुकीची कोंडी

       स्टेशन रोड मार्गावरील अकोला क्रिकेट क्लबवर गणेश मूर्ती विक्रीची बाजारपेठ सजली होती; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात पार्किंगची सुविधा करण्यात आली नाही. परिणामी या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, टॉवर चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

*चोख पोलीस बंदोबस्त

   श्रींच्या स्वागतासाठी बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता बाजारपेठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. असे असले तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक शाखेच्या मोजक्याच पोलीस कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली होती. या व्यतिरिक्त शहरातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या अनुषंगाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.