शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

अकोटातील पुनर्वसित गावात मृत्यूचे तांडव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:19 IST

चार वर्षांत २२८ मृत्यू; मेळघाटातून झाले पुनर्वसन, मुलभूत सुविधा नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या गावाचं पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आलं; परंतु या गावात आदिवासी बांधवांना सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. जंगलवस्ती सोडल्यानंतर पुनर्वसित गावात सुविधा नसल्याने या गावात आरोग्य व अस्वस्थतेच्या कारणांमुळे चार वर्षात २२८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या पुनर्वसनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोणा, धारगड या सहा गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सन २०११ ते २०१५ यादरम्यान टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करतेवेळी आदिवासी बांधवांना मूलभूत सोयी-सुविधेपासून तर आर्थिक सक्षमता व उदरनिर्वाहापर्यंतचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र प्रति कुटुंब १० लाखाच्या वर कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुनर्वसित गावात देण्यात आल्या नाहीत.वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सर्वप्रथम पुनर्वसित आठ गावांना पुरविणे आवश्यक होते. मात्र, त्या सुविधा त्यांना मिळाल्याच नसल्याने या गावांमध्ये मृत्यूचा दर वाढला असून, त्यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोट तालुक्यातील दहीखेल फुटकर येथे गुल्लरघाट या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावाचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुल्लरघाट येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा युवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुल्लरघाट व धारगड येथे कागदोपत्रीच ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे.२२८ जणांच्या मृत्यूची नोंद नाहीगत चार वर्षांत मृतांमध्ये गुल्लरघाट १२ मृत्यूमध्ये सहा युवक, अमोना येथे नऊ मृत्यूपैकी दोन युवक,धारगड ४२ मृत्यूपैकी २० युवक, सोमठाणा खुर्द १० पैकी तीन युवक, केलापाणी १२ पैकी नऊ युवक, नगरतास १३ पैकी ९ युवक, बारूखेडा ६६ पैकी २५ युवक, सोमठाणा ६४ पैकी ३० युवक असे एकूण आठ गावांत २२८ मृत्यूसंख्येत ३० ते ३५ वयोगटातील १०४ युवकांचा समावेश आहे. या २२८ जणांच्या मृत्युची नोंदही कुठेच नाही. बुधवार १६ आॅगस्टला पुनर्वसित केलपानी येथे झालेल्या आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा आकडा पुढे आला.पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सुविधा पुरविण्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.- प्रमोद लाकरा,उपवनसंरक्षक,अकोट वन्यजीव विभाग