शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

अकोटातील पुनर्वसित गावात मृत्यूचे तांडव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:19 IST

चार वर्षांत २२८ मृत्यू; मेळघाटातून झाले पुनर्वसन, मुलभूत सुविधा नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या गावाचं पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आलं; परंतु या गावात आदिवासी बांधवांना सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. जंगलवस्ती सोडल्यानंतर पुनर्वसित गावात सुविधा नसल्याने या गावात आरोग्य व अस्वस्थतेच्या कारणांमुळे चार वर्षात २२८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या पुनर्वसनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोणा, धारगड या सहा गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सन २०११ ते २०१५ यादरम्यान टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करतेवेळी आदिवासी बांधवांना मूलभूत सोयी-सुविधेपासून तर आर्थिक सक्षमता व उदरनिर्वाहापर्यंतचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र प्रति कुटुंब १० लाखाच्या वर कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुनर्वसित गावात देण्यात आल्या नाहीत.वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सर्वप्रथम पुनर्वसित आठ गावांना पुरविणे आवश्यक होते. मात्र, त्या सुविधा त्यांना मिळाल्याच नसल्याने या गावांमध्ये मृत्यूचा दर वाढला असून, त्यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोट तालुक्यातील दहीखेल फुटकर येथे गुल्लरघाट या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावाचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुल्लरघाट येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा युवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुल्लरघाट व धारगड येथे कागदोपत्रीच ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे.२२८ जणांच्या मृत्यूची नोंद नाहीगत चार वर्षांत मृतांमध्ये गुल्लरघाट १२ मृत्यूमध्ये सहा युवक, अमोना येथे नऊ मृत्यूपैकी दोन युवक,धारगड ४२ मृत्यूपैकी २० युवक, सोमठाणा खुर्द १० पैकी तीन युवक, केलापाणी १२ पैकी नऊ युवक, नगरतास १३ पैकी ९ युवक, बारूखेडा ६६ पैकी २५ युवक, सोमठाणा ६४ पैकी ३० युवक असे एकूण आठ गावांत २२८ मृत्यूसंख्येत ३० ते ३५ वयोगटातील १०४ युवकांचा समावेश आहे. या २२८ जणांच्या मृत्युची नोंदही कुठेच नाही. बुधवार १६ आॅगस्टला पुनर्वसित केलपानी येथे झालेल्या आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा आकडा पुढे आला.पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सुविधा पुरविण्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.- प्रमोद लाकरा,उपवनसंरक्षक,अकोट वन्यजीव विभाग