शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अकोट-अकोला मार्ग ठरतोय जीवघेणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये ...

राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये शासनाने दिले. परंतु आधीच्या कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम सोडून गाशा गुंडाळला. त्यानंतर सदर रस्त्याचे प्रकरणात न्यायालयात गेले होते. त्यानंतर नवीन कंपनीला या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने कामाचा मुहूर्त काढला. परंतु कामाची गती वाढवली नाही. परिणाम पावसाळ्यात या रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे स्वर्ग गाठण्यागत परिस्थिती झाली. सध्याही हा रस्ता कमी-जास्त चढ-उतार असल्याने सतत अपघात घडत आहेत. कच्चा रस्त्यावर धूळ, चिखल व गिट्टी उखडली आहे. रस्त्याच्या कामाकडे कोणाचेही लक्ष नाहीच. या मार्गावर काम सुरू असताना शासनाचा कोणताही अभियंता, अधिकारी हजर नसल्याने रामभरोसे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत आहे. विविध पक्ष, संघटनेचे आंदोलने बेअसर ठरले आहेत.

रेफर अनेक रुग्णांचा मृत्यू

अकोट ग्रामीण रुग्णालयातून अनेक गंभीर रुग्णांना अकोला उपचारासाठी रेफर करण्यात येते. परंतु ४५ किमी रस्ता पार करण्यात अनेक अडचणी येत असल्याने अनेक रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाल्याचा आकडा मोठा आहे. शिवाय दुचाकीच्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. नुकताच एसटीचा अपघात झाला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे हा रस्ता अजून किती बळी घेणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फोटो: