शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

अकोट-अकोला मार्ग ठरतोय जीवघेणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये ...

राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये शासनाने दिले. परंतु आधीच्या कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम सोडून गाशा गुंडाळला. त्यानंतर सदर रस्त्याचे प्रकरणात न्यायालयात गेले होते. त्यानंतर नवीन कंपनीला या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने कामाचा मुहूर्त काढला. परंतु कामाची गती वाढवली नाही. परिणाम पावसाळ्यात या रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे स्वर्ग गाठण्यागत परिस्थिती झाली. सध्याही हा रस्ता कमी-जास्त चढ-उतार असल्याने सतत अपघात घडत आहेत. कच्चा रस्त्यावर धूळ, चिखल व गिट्टी उखडली आहे. रस्त्याच्या कामाकडे कोणाचेही लक्ष नाहीच. या मार्गावर काम सुरू असताना शासनाचा कोणताही अभियंता, अधिकारी हजर नसल्याने रामभरोसे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत आहे. विविध पक्ष, संघटनेचे आंदोलने बेअसर ठरले आहेत.

रेफर अनेक रुग्णांचा मृत्यू

अकोट ग्रामीण रुग्णालयातून अनेक गंभीर रुग्णांना अकोला उपचारासाठी रेफर करण्यात येते. परंतु ४५ किमी रस्ता पार करण्यात अनेक अडचणी येत असल्याने अनेक रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाल्याचा आकडा मोठा आहे. शिवाय दुचाकीच्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. नुकताच एसटीचा अपघात झाला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे हा रस्ता अजून किती बळी घेणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फोटो: