शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अकोलेकरांनो, ‘स्वच्छता अँप’चा वापर करा - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:22 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’ तयार केले असून, या अँपचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. 

ठळक मुद्देजानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणारमोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’ तयार केले असून, या अँपचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची तपासणी केली. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त  झाल्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २0१८’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. 

‘स्वच्छता अँप’मुळे तक्रारींचा निपटारा!शहरातील बाजारपेठ, घरालगतचा परिसर, सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा किंवा मैदानांवर घाण, कचरा व अस्वच्छता दिसल्यास त्याची तक्रार मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडे करण्याची गरज नाही. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने  ‘स्वच्छता अँप’ विकसित केले आहे. यामध्ये शहरात आढळणारे मृत  प्राणी, कचर्‍याचे ढीग तसेच कचरा गाडी आली नसेल, तर त्यासंदर्भातील तक्रार स्मार्ट फोनच्या माध्यमातून नागरिकांना नोंदवता येणार आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकांकडून तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे. अकोलेकरांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छता अँप’ डाउनलोड करण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

आधी २९६ क्रमांक आता ५३!एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या शहरांमध्ये राबवल्या जाणार्‍या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत गतवर्षी अकोला शहर २९६ क्रमांकावर होते. आजरोजी शहर ५३ व्या क्रमांकावर आहे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्यास त्यामध्ये आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आयुक्त वाघ यांनी व्यक्त केली. 

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचाशहरात स्वच्छता राखण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून मनपा आवार तसेच शहरात विविध भागात ‘स्वच्छता अँप’च्या माहितीसाठी स्टॉल लावल्या जात आहेत. गुरुवारी उपमहापौर वैशाली शेळके यांनी ‘स्वच्छता अँप’च्या स्टॉलला भेट देऊन नागरिकांना आवाहन केले आहे. - 

टॅग्स :Akola cityअकोला शहरcommissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिका