शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अकोलेकरांनो! नियम पाळा; अन्यथा निर्बंध वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST

अकोला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी हाेती. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची ...

अकोला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी हाेती. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात रविवार रात्री १२ वाजेपासून ते शनिवार १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे आतातरी अकाेलेकरांनी नियम पाळण्याची गरज आहे अन्यथा निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता सतावते. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांची भयावह संख्या समोर येत आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली मात्र यादरम्यान सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेच्या खरेदीची सूट दिली आहे. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. शहराच्या मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम आहे. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंधांचे संकेत दिले हाेते; मात्र नागरिकांवर याचा काही फरक पडला असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता भाजीबाजारासह सर्वच सेवा १५ मे पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. आता अकाेलेकरांनी किमान पुढील पाच दिवस संयम ठेवत या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा शहराच्या अर्थकारणालाच ब्रेक लागेल अन् ते काेणालाही परवडणारे नाही.

--बॉक्स--

भाजी खरेदीसाठी उसळली गर्दी

साेमवारपासून भाजीबाजारही बंद केल्यामुळे रविवारी सकाळी भाजी खरेदीसाठी माेठी गर्दी उसळली हाेती. सकाळी भाज्यांचे भाव तेजीत हाेते. नागरिकांनी पाच दिवसांची नव्हे तर १५ दिवसांची भाजी खरेदी केल्याचे चित्र हाेते.

--बॉक्स--

कठोर निर्बंधांचे हेही एक कारण!

शहरातील डाबकी रोड, कौलखेड रोड, पीकेव्ही तसेच विविध परिसरातील नगरांमध्ये माॅर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली मुक्त संचार सुरू असताे.

-

--बॉक्स--

पाेलिसांच्या दंडुक्यांशिवाय सुधारणार नाही का?

पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाेलिसांनी दंडुक्यांचा वापर केल्यामुळे रस्त्यावरची गर्दी ओसरली हाेती. गेल्या पंधरा दिवसात संचारबंदी असली तरी पाेलिसांनी दंडुक्यांऐवजी दंड हा पर्याय निवडला आहे. पाेलिसांनी केलेल्या दंडालाही नागरिक भीक घालत नव्हते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कायमच हाेती. त्यामुळे आता कठाेर निर्बंध आहेत, त्यामुळे बाहेर पडून नका, पुन्हा दंडुकेच हवे आहेत का? असाही प्रश्न निर्माण हाेत आहे.