शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो! नियम पाळा; अन्यथा निर्बंध अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता ...

लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता सतावते. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांची भयावह संख्या समोर येत आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेच्या खरेदीची सूट दिली आहे. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. शहराच्या मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम आहे. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंधांचे संकेत दिले; मात्र नागरिकांवर याचा काही फरक पडला नसल्याचे दिसून येते. सगळेच व्यवहार बंद हाेण्यापेक्षा काही दिवस संयम पाळून गर्दी कमी केली तर काेराेनाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अन्यथा शहराच्या अर्थकारणालाच ब्रेक लागेल अन् ते काेणालाही परवडणारे नाही.

--बॉक्स--

या मार्गावर सर्वाधिक गर्दी

ताजनापेठ ते जैन मंदिर व गांधी रोड या मार्गावर सर्वाधिक गर्दी होत आहे. हीच परिस्थिती टिळक रोडवरील बियाणी चौकातील आहे. या मार्गावर प्रत्येक दुकानापुढे दोन-चार नागरिक दिसून येतात.

--बॉक्स--

कठोर निर्बंधांचे हेही एक कारण!

जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सूट आहे; मात्र नागरिक सकाळी ११ वाजेनंतर विनाकारण फिरत आहेत. शहरातील डाबकी रोड, कौलखेड रोड, पीकेव्ही तसेच विविध परिसरातील नगरांमध्ये माॅर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकच्या नावाखाली मुक्त संचार सुरू आहे.

--बॉक्स--

चौकात कोरोना टेस्ट ; तरीही मुक्त संचार

पोलीस व मनपा प्रशासनाकडून दंडात्मक आणि फौजदारी कारवाई तसेच वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. परंतु, अकोलेकर ऐकायला तयार नाहीत. त्यानुसार शहरातील चौकात कोरोना टेस्ट केली जात आहे. तरीही नागरिक विनाकारण फिरत आहेत.

--बॉक्स--

कुटुंब घेऊन खरेदीला

अत्यावश्यक सेवेचा कालावधी वगळता रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये काही महाभाग गरज नसताना पत्नी व मुलांना घेऊन खरेदीसाठी फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवापेक्षा कुटुंबासोबत खरेदी महत्त्वाची झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

--बॉक्स--

पाेलिसांच्या दंडुक्यांशिवाय सुधारणार नाही का?

पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाेलिसांनी दंडुक्यांचा वापर केल्यामुळे रस्त्यावरची गर्दी ओसरली हाेती. आता संचारबंदी असली तरी पाेलिसांनी दंडुक्यांऐवजी दंड हा पर्याय निवडला आहे. पाेलिसांनी केलेल्या दंडालाही नागरिक भीक घालत नाहीत, त्यामुळे पुन्हा दंडुकेच हवे आहेत का? असाही प्रश्न निर्माण हाेत आहे.