शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गणेशोत्सवात अकोलेकरांनी वितरित केला तीन कोटींचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:06 IST

गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

अकोला : गत दहा दिवस चाललेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गणेशोत्सवादरम्यान खोबरा, नारळ आणि शेंगदाण्याची विक्रमी विक्री झाल्याची माहिती होलसेल किराणा बाजारातील यंत्रणेने दिली आहे. विशेष म्हणजे यामध्ये खवा आणि साखर वेगळीच राहिली. ती गणना केली तर जवळपास दोन कोटींची अधिक वाढ यामध्ये होते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.गणेशोत्सवात सर्वात जास्त विक्री ही खोबरा आणि नारळची होते. त्या खालोखाल शेंगदाणे, साखर आणि खवा असतो. अकोल्यात दर महिन्याला असलेली मागणी पाहता, गणेशोत्सवाच्या कार्यकाळात दुपटीने खोबरा, नारळ आणि शेंगदाण्याची मागणी होते. खोबरा डोल आणि खोबरा तुकड्याची विक्री यंदा १५० ते १८० रुपये प्रती किलोने झाली. दर महिन्याला अकोल्यात चार गाड्या (ट्रक) खोबऱ्यांची विक्री होते; मात्र गणेशोत्सव दरम्यान नवीन किराणा बाजारातून १२ खोबरा गाड्यांची विक्री झाली. त्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यासोबतच भुईमूग शेंगदाण्याची मागणी यादरम्यान वाढली. ९५ ते १२० रुपये किलो असलेल्या शेंगदाण्याच्या पाच गाड्या यादरम्यान उतरल्यात. जवळपास एक कोटीचे शेंगदाणे अकोलेकरांनी वितरित करीत फस्त केले. पूजेसाठी लागणाºया नारळालादेखील मोठी मागणी राहिली. दहा गाड्या नारळाचे ट्रक अकोल्यात खाली झाले. पन्नास लाखांची उलाढाल यावर झाली. एकूण तीन कोटी रुपयांची उलाढाल केवळ खोबरा, नारळ आणि शेंगदाण्यावर झाली. साखर आणि खवा याची मोजणी केली असता, हा गणेशोत्सवाचा प्रसाद पाच कोटींच्या घरात पोहोचल्याच्या नोंदी मिळत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGanesh Mahotsavगणेशोत्सव