शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:12 IST

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदमार्फत सद्यस्थितीत ३५ प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. योजनांची गुणवत्ता जपण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्ती (रिपीटेशन) होऊ नये तसेच योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. विकासकामे आणि प्रशासकीयदृष्ट्या कामांचा आढावादेखील या प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी लागणारा वेळ, अर्जांसाठी लाभार्थींचा होणारा खर्च वाचणार असून, कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही आणि जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे,जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे उपस्थित होते.पाणीटंचाईच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा सज्ज!जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, पाणीटंचाई निवारणासाठी गावनिहाय उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. भूजल पातळी खोल गेल्याने जिल्ह्यात १०५ हातपंप बंद पडले असून, १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून हातपंप दुरुस्तीची कामे करण्यत येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत ‘रोहयो’चे एक काम!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान एक काम सुरू करण्यात येणार आहे, त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचल करण्याकरिता दोन पंप नादुरुस्त झाल्याच्या स्थितीत सुकळी येथील तलावातून तात्पुरत्या स्वरूपात ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद