शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:12 IST

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदमार्फत सद्यस्थितीत ३५ प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. योजनांची गुणवत्ता जपण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्ती (रिपीटेशन) होऊ नये तसेच योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. विकासकामे आणि प्रशासकीयदृष्ट्या कामांचा आढावादेखील या प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी लागणारा वेळ, अर्जांसाठी लाभार्थींचा होणारा खर्च वाचणार असून, कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही आणि जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे,जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे उपस्थित होते.पाणीटंचाईच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा सज्ज!जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, पाणीटंचाई निवारणासाठी गावनिहाय उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. भूजल पातळी खोल गेल्याने जिल्ह्यात १०५ हातपंप बंद पडले असून, १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून हातपंप दुरुस्तीची कामे करण्यत येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत ‘रोहयो’चे एक काम!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान एक काम सुरू करण्यात येणार आहे, त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचल करण्याकरिता दोन पंप नादुरुस्त झाल्याच्या स्थितीत सुकळी येथील तलावातून तात्पुरत्या स्वरूपात ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद