शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

अकोला जिल्हा परिषद : उलंगवाडीच्या काळात विकासाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:12 IST

अकोला: जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आता संपण्यात आहे. जिल्हा परिषद गट, गणांची प्रभाग रचना अंतिम होत असताना सर्वांना निवडणूक लढण्याचे वेध लागले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा दुसºया सत्रातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचा काळ हा कमालीचा बेबनावाचा गेला.याच काळात दलित वस्ती विकास निधी वाटप, रिक्त पदांवर अधिकारी नियुक्तीसाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्हा परिषदेची सर्कस चालवणे सध्याच्या काळातील सत्ताधारी-विरोधक पदाधिकाºयांना आवाक्याबाहेरच गेले.

अकोला: जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आता संपण्यात आहे. जिल्हा परिषद गट, गणांची प्रभाग रचना अंतिम होत असताना सर्वांना निवडणूक लढण्याचे वेध लागले आहेत. एकप्रकारे विद्यमान पदाधिकाºयांसाठी हा उलंगवाडीचा काळ आहे. याच काळात दलित वस्ती विकास निधी वाटप, रिक्त पदांवर अधिकारी नियुक्तीसाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यातून पदाधिकारी खरेच विकासकामे करणारे आहेत की मतदारांकडे जाण्यापूर्वी वातावरण निर्मिती केली जात आहे, ही सार्थ शंका सद्यस्थितीतील घडामोडींवरून येते.जिल्हा परिषदेचा दुसºया सत्रातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचा काळ हा कमालीचा बेबनावाचा गेला. अडीच वर्षात मागासवर्गीयांच्या हितासाठी काय केले. जिल्हा विकासासाठी काय केले, याचे ठोस उदाहरण मिळणे कठीण आहे. सत्ताधाºयांचा बेबनाव तर आहेच, त्याचवेळी विरोधी भाजप-शिवसेनेलाही विरोधक म्हणून त्याचा जाब विचारला जाणार आहे. सत्ताधाºयांना गेल्या दोन वर्षात दलित वस्ती कामांचा निधी खर्च करता आला नाही. जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामांसाठी प्राप्त होणाºया निधीत गेल्या तीन वर्षात सातत्याने कपात होत गेली. चालू वर्षात तर १ कोटी ८९ लाखांवर जिल्हा परिषदेची बोळवण करण्यात आली. त्यातून ना धड रस्ते निर्मिती ना दुरुस्ती करता येते, याचा कोणत्याही पातळीवर सत्ताधाºयांनी विचार केलेला कोणत्याही सभेतील कामकाजात दिसत नाही. दलित वस्ती निधी खर्चाच्या वाटपात असमानता आहे, असे सांगत सत्ताधारी सदस्य, शिवसेनेने त्या वाटपालाच रोखून धरले. जिल्ह्यातील दलित वस्ती विकासाच्या मुद्यांवर भाजपने सत्ताधारी भारिप-बमसं, शिवसेनेला लक्ष केले. त्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरत अधिकाºयांच्या बुद्धीला श्रद्धांजली वाहिली. या प्रकाराने जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाºयांपैकी कोणाला काय हवे, याचा धांडोळा घेण्याची वेळ आली आहे.भाजपने ऐन अखेरच्या दिवसात दलित वस्तीच्या निधीसाठी आंदोलन केले. राज्यातही सत्ताधारी असलेल्या या पक्षाच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदावर अधिकारी आणण्यासाठी काय केले, जिल्हा नियोजन समितीकडून कपात होणाºया निधीबाबत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना साधी विचारणाही केली नाही. शिवसेनेने ऐनवेळी दलित वस्तीचा निधी रोखून धरण्याची खेळी केली, तर सत्ताधाºयांच्या बेबनावाने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. त्याशिवाय, सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभापतींना ‘एकला चलो रे’ च्या मार्गाला जावे लागले. या सर्व घटनांमागील आंतर-परस्पर संबंधाचा विचार केल्यास एकूणच जिल्हा परिषदेची सर्कस चालवणे सध्याच्या काळातील सत्ताधारी-विरोधक पदाधिकाºयांना आवाक्याबाहेरच गेले. त्याचे परिणाम, जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला भोगावे लागत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद