शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

अकोला गारठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 01:20 IST

कृषी विद्यापीठाने नोंदवले ५.0 अंश तापमान.

अकोला, दि. १३- विदर्भात थंडीची लाट आली असून, येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात ५.0 अंश तपामानाची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. ही थंडी रब्बीतील गहू, हरभरा, मोहरी पिकाला पोषक असली तुरीच्या शेंगा, केळी व इतर फळपिकांना बाधक ठरू शकते. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा परिपूर्ण कालावधीच्या अगोदर परिपक्व होत आहेत.जानेवारी महिन्यात किमान तापमानात चढ-उतार वाढला असून, ११ जानेवारीपासून किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. ११ जानेवारीला कृषी विद्यापीठाने ६.२ किमान तापमानाची नोंद केली आहे. १२ जानेवारीला ५.४ तर १३ जानेवारीला हे तापमान ५.0 शून्य अंशावर आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या १८ तारखेला ९.६, १९ नोव्हेंबरला ९.२, २0 ला ९.0, २१ नोव्हेंबरला ९.६, २२ ला ९.५, २३ तारखेला ९.७ एवढे किमान तापमान होते. तर डिसेंबर महिन्यात १0 तारखेला ७.१, १९ डिसेंबरला ७.२, २0 ला ८.0, २२ रोजी ८.१, तर सर्वाधिक कमी तापामन २७ डिसेंबरला ५.८ अंश होते. मागील तीन वर्षात हे सर्वाधिक कमी तापमान कृषी विद्यापीठाने नोंदवले आहे. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर परिपक्व होत आहेत. थंडीमुळे अन्नद्रव्याचा पुरवठा तुरीच्या शेंगांना होत नसल्याने फेब्रुवारीत तयार होणारे हे पीक अनेक ठिकाणी आताच काढणीला आले आहे. अंबिया बहार संत्र्याच्या फुलोर्‍यावरही थंडी बाधक तर आहेच केळी पिकांवर जास्त परिणाम करणारी ठरू शकते. थंडीची लाट; काळजी घ्या - जिल्हाधिकारीयेत्या ४८ तासात जिल्हय़ात थंडी वाढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असून, जिल्हय़ातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.अतिरिक्त थंडीमुळे केळी लवकर पिवळी पडण्याची शक्यता असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांनी शेताच्या बांधावर काडीकचरा पेटवून धूर करावा त्यामुळे थंडीपासून फळांचा बचाव करता येईल. रब्बीतील हरभरा, गहू पिकांसाठी ही थंडी पोषक आहे. मोहरीदेखील या थंडीने चांगली येईल. शेतकर्‍यांनी फळ पिक ांची काळजी घ्यावी.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.