शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी

By admin | Updated: August 6, 2015 01:20 IST

नदी-नाल्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला.

अकोला: गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात अतवृष्टी झाली असून,नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर येथे संततधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७९.४३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सातही तालुक्यात अतवृष्टी झाली. बुधवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलावरून २५ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अकोला शहरानजीकच्या चांदूर गावाचा संपर्क तुटला. तसेच विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर, नवी उमरी, तळेगाव पातुर्डा या गावांचा संपर्क तुटला. बाळापूर तालुक्यात अंदुरा येथील पानखास नाल्याला आलेल्या पुरामुळे शेगाव-आकोट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, या गावाचा संपर्क तुटला. पानखास नाल्याला आलेल्या पुरात पेट्रोलचा टँकर अडकला असून, पुरामुळे टँकरच्या टपावर बसलेल्या टँकर चालक व क्लिनरला पुरातून बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. तेल्हारा तालुक्यात नागझरी नाल्याला आलेल्या पुरात वाडी अदमपूर येथील मंदिरात झोपलेली रेशमा पंढरी भोजने (९0) या वृद्ध महिलेचा मंगळवारी पहाटे वाहून गेल्याने मृत्यू झाला. पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांची वाहतूक बंद झाली. त्यामुळे संबंधित गावांचा संपर्क तुटल्याने, जनजीवन विस्कळीत झाले.