शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अकोला जिल्हय़ात संततधार पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 00:59 IST

खरीप पिकांना संजीवनी; रब्बी हंगामासाठी उपयुक्त.

अकोला: जिल्हय़ातील सातही तालुक्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस बरसला. या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापणार्‍या कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते. सकाळी ११ वाजतापासून अकोला शहरासह जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार बरसलेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. खरीप पिकांप्रमाणेच येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. या पावसामुळे जमिनीतील वाढणारा ओलावा रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

*अकोल्यात २६.0६ मि.मी. पाऊस!

 गुरुवारी दिवसभर अकोला शहरात दमदार पाऊस बरसला. रात्री ८.३0 वाजेपर्यंत शहरात २६.0६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतवृष्टीचा इशारा! गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या २४ तासात अकोला जिल्हय़ासह विदर्भात अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागपूर येथील हवामान वेधशाळेकडून देण्यात आला.

*धरणातील जलसाठय़ात अद्याप वाढ नाही

  जिल्हय़ातील जलसाठय़ात अद्याप कोणतीही वाढ झाली नाही. काटेपूर्णा धरणात २७ टक्के जलसाठा कायम असून, या धरणाच्या परिसरात केवळ २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोर्णा धरणाच्या परिसरात मात्र शून्य टक्के पाऊस आहे. या धरणाची पातळी ३७ टक्के आहे. उमा धरणाच्या परिसरात १0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणात आजमितीस २८ टक्के जलसाठा आहे. निगरुणा धरणाचा जलसाठा ५१ टक्के असून, या परिसरात २७ मि.मी. पावसाच नोंद झाली आहे.