शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात संततधार पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 00:59 IST

खरीप पिकांना संजीवनी; रब्बी हंगामासाठी उपयुक्त.

अकोला: जिल्हय़ातील सातही तालुक्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस बरसला. या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापणार्‍या कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते. सकाळी ११ वाजतापासून अकोला शहरासह जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार बरसलेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. खरीप पिकांप्रमाणेच येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. या पावसामुळे जमिनीतील वाढणारा ओलावा रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

*अकोल्यात २६.0६ मि.मी. पाऊस!

 गुरुवारी दिवसभर अकोला शहरात दमदार पाऊस बरसला. रात्री ८.३0 वाजेपर्यंत शहरात २६.0६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतवृष्टीचा इशारा! गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या २४ तासात अकोला जिल्हय़ासह विदर्भात अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागपूर येथील हवामान वेधशाळेकडून देण्यात आला.

*धरणातील जलसाठय़ात अद्याप वाढ नाही

  जिल्हय़ातील जलसाठय़ात अद्याप कोणतीही वाढ झाली नाही. काटेपूर्णा धरणात २७ टक्के जलसाठा कायम असून, या धरणाच्या परिसरात केवळ २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोर्णा धरणाच्या परिसरात मात्र शून्य टक्के पाऊस आहे. या धरणाची पातळी ३७ टक्के आहे. उमा धरणाच्या परिसरात १0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणात आजमितीस २८ टक्के जलसाठा आहे. निगरुणा धरणाचा जलसाठा ५१ टक्के असून, या परिसरात २७ मि.मी. पावसाच नोंद झाली आहे.