शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

अकोला मनपा अभियंत्याची गळा आवळून हत्या !

By admin | Updated: March 26, 2016 02:34 IST

पाणी मागितल्यावरून झाला वाद; दोन आरोपी गजाआड.

अकोला: धुळवड सर्वत्र साजरी होत असताना, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मनपातील कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम हे पाणी पिण्यासाठी सिंधी कॅम्पजवळील एका ज्युस सेंटरवर गेले असता, या ठिकाणी पाणी मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन चार ते पाच जणांनी नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा आवळला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलिसांनी दोघा युवकांना अटक केली. धुळवडीची सुटी असल्याने, महापालिकेतील जलप्रदाय विभागात मानधनावर काम करणारे कनिष्ठ अभियंता नंदलाल नारायण मेश्राम (४५) हे दुपारी घरातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत रवी धरमसिंह माहोत (३५) हा सहकारीसुद्धा होता. काही वेळानंतर त्यांना तहान लागल्यामुळे ते सिंधी कॅम्प परिसरातील मनपा संकुलासमोरील एका ज्युस सेंटरवर गेले. या ठिकाणी त्यांनी आरोपी मोहसिन मजिद खान (३0) याला पिण्यास पाणी मागितले. मोहसिनने पाणी देण्यास नकार दिल्याने, नंदलाल मेश्राम यांनी तू मला ओळखत नाहीस का, मी महापालिकेतील अधिकारी आहे, असे सांगितले. त्यावर मोहसिन मजिद खान, त्याचा भाऊ जावेद मजिद खान (३२) यांनी मेश्राम यांच्यासोबत वाद घातला. शब्दाने शब्द वाढत गेल्याने, वाद विकोपाला पोहोचला. ज्युस सेंटरवरील मोहसिन, जावेद आणि त्यांच्या ज्युस सेंटरवर काम करणारा नदीम नामक युवकासह आणखी दोघांनी नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा हातांनी गळा दाबला. यातच मेश्राम यांचा मृत्यू झाला. रवी माहोत यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ३२३, ५0४, ५0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मोहसिन मजिद खान व जावेद मजिद खान यांना अटक केली. नदीम व इतर सहकारी फरार आहेत. श्‍वसननलिका दबल्याने मृत्यू नंदलाल मेश्राम यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात मेश्राम यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला. गळा दाबताना मेश्राम यांची श्‍वसननलिका दबल्यामुळे श्‍वासोच्छवास घ्यायला त्रास झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. असे कारण नमूद केले आहे. चिमूर येथे झाले अंत्यसंस्कार नंदलाल मेश्राम यांचे आई-वडील, भाऊ चिमूरला राहतात. ते नोकरीमुळे अकोल्यात स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर चिमूर येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी नातेवाइकांच्या ताब्यात नंदलाल मेश्राम यांचे पार्थिव देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय पार्थिव घेऊन चिमूरला रवाना झाले.