शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला महापालिका कर्मचारी पुन्हा संपावर?

By admin | Updated: May 28, 2014 22:00 IST

संघर्ष समितीने दिला प्रशासनाला इशारा

अकोला : महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, कालबद्ध पदोन्नती, थकीत वेतन आदी विविध मुद्यांवर पुन्हा एकदा मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. संघर्ष समितीच्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यास येत्या ४ जूनपासून संप पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. मनपातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचार्‍यांना अद्यापही पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्यात आली नाही. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना ही रक्कम देय करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आजारी कर्मचार्‍यांना उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कालबद्ध पदोन्नतीसह थकीत वेतनाची समस्या कायम आहे. शहरात साफसफाईची कामे करण्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील उपलब्ध कर्मचारी संख्या पुरेसी नसल्याने किमान ३०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे. कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे, याबाबीचा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर प्रशासनाला ४ कोटींचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते. सदर अनुदानातून पाचव्या वेतनाची समस्या निकाली निघण्यास मदत होईल. यामुळे या विषयावर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा ४ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा मनपा कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. ** एलबीटीच्या उत्पन्नात वाढ नाहीच!२० एप्रिल ते २० मेपर्यंत स्थानिक संस्था कर विभागाला ३ कोटी ५८ लाख रुपये प्राप्त झाले. मार्च महिन्यात हीच वसुली ४ कोटी २० लाखापर्यंत पोहोचली होती. एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेने व्यापार्‍यांमध्ये निरुत्साह आहे. तर ही बाब एलबीटी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथ्यावर पडत आहे. एका कर्मचार्‍याला गुटखा विके्रत्यांकडून किमान ४० हजारांचा हप्ता प्राप्त होत असल्याची माहिती आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.