शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

अकोला महापालिका हद्दवाढीची बैठक लांबणीवर

By admin | Updated: January 8, 2015 00:53 IST

ग्रामपंचायतींनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास.

अकोला: महापालिका हद्दवाढीच्या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक लांबणीवर गेली. बुधवारी होणारी बैठक काही कारणामुळे होऊ शकली नाही. बैठक टळल्यामुळे शहरानजिकच्या ग्रामपंचायतींनी मात्र सुटकेचा नि:श्‍वास सोडला.शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ र्मयादित असल्यामुळे शहरातील जमिनींचे भाव प्रचंड वधारले आहेत. त्याचा परिणाम रहिवासी इमारतींच्या बांधकामावर होत आहे. मध्यमवर्गीयांसाठी शहरात जागा विकत घेऊन घर बांधणे अशक्य झाल्याचे चित्र आहे. याशिवाय शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा मनपाकडून पुरविल्या जाणार्‍या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. अकोला शहराची लोकसंख्या व भविष्यातील हद्दवाढ लक्षात घेता, मनपा प्रशासनाने २00२ मध्ये हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये शहरालगतच्या २१ गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला होता. अधिवेशनात हद्दवाढीच्या मुद्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले असता, मनपाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मनपा हद्दवाढीचे सुमारे सहा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले. अद्यापपर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यादरम्यान, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शहरासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू करणे व हद्दवाढीसाठी पुढाकार घेतल्याने आशादायी चित्र निर्माण झाले. हद्दवाढीच्या मुद्यावर डॉ.पाटील यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. ६ जानेवारी रोजी आयोजित बैठक टळल्यामुळे ७ जानेवारी रोजी घेतल्या जाणार होती; परंतु काही कारणास्तव ही बैठक लांबणीवर गेली. यामुळे बरखास्तीची धाकधूक असलेल्या ग्रामपंचायतींनी मात्र सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनपाची हद्दवाढ करण्यासाठी मुंबईत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती; परंतु इतर कामांच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नाही. हद्दवाढीच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले. *हद्दवाढ आवश्यकशहराचे र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता, मनपाची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रात बांधकाम करताना व्यावसायिकांना ह्यएफएसआयह्णची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामपंचायत क्षेत्रात इमारती उभारण्याला प्राधान्य दिले आहे; परंतु ग्रामपंचायत हद्दीत लेआऊटचे निर्माण नसल्यामुळे कालांतराने मूलभूत सोयी-सुविधांच्या अडचणी निर्माण होतात. भविष्यात मनपाची हद्दवाढ झाल्यास प्रशासनासमोर ग्रामपंचायत क्षेत्रातील अवैध बांधकामाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.