शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अकोला महापालिका: राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:52 IST

अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला.

ठळक मुद्दे मु ख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने या भागातील विकास कामांचे ६१० प्रस्ताव तयार क रीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रस्तावाला नगर विकास विभागाकडून हिरवी झेंडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी राज्य शासनाने १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानुषंगाने महापालिका प्रशासनाने विकास कामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला. या प्रस्तावावर शासनाने अद्यापही निर्णय न घेतल्यामुळे प्रत्यक्षात कामाला विलंब होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यादरम्यान, १०० कोटींच्या कामांमध्ये मनपाला २० टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे शासनाने अनिवार्य केले आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे मनपा प्रशासनाने शासनाकडे हद्दवाढीची मागणी रेटून धरली होती. तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये ले-आउट नसल्यामुळे रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणीपुरवठा आदी सुविधांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला. त्यापैकी मु ख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने या भागातील विकास कामांचे ६१० प्रस्ताव तयार क रीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. जिल्हाधिकाºयांनी यापैकी ५९० प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आले. या प्रस्तावाला नगर विकास विभागाकडून हिरवी झेंडी मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह महापौर विजय अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.मनपाचा आर्थिक हिस्सा; अट नाकारली!महापालिका प्रशासनाने नुकतीच मालमत्तांची ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मोजणी केली. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा १८ कोटींवरून थेट ५० कोटींच्या घरात गेला. ही वसुली अद्याप व्हायची असल्याने व मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने राज्य शासनाने १०० कोटींच्या प्रस्तावात मनपाचा २० टक्के आर्थिक हिस्सा जमा करण्याची अट रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह महापौर विजय अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती. ही अट शासनाने नाकारल्यामुळे मनपाला टप्प्याटप्प्याने का होईना, आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका