शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

अकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:50 IST

अकोला : स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे ...

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे महापालिकेने पाठ फिरविल्याची परिस्थिती आहे. घनकचºयाच्या मुद्यावर शासनाच्या भूमिकेत वेळोवेळी बदल होत असल्याने मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. यात भरीस भर मनपाचे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून पसार होत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य निरीक्षकांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१५ ते २०१७ या कालावधीत महापालिके च्या स्तरावर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कचºयाचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. शासनाचा ‘अल्टीमेटम’ कधीचाच संपुष्टात आला असला, तरी अद्यापही स्वायत्त संस्थांचे अनुदान बंद करण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कचरा विलगीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.मुख्य रस्त्यांलगत कचरा!कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीचे १६ आणि भाडेतत्त्वावर ३३ ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटागाड्यांची व्यवस्था आहे. कचºयाच्या मुद्यावर एवढा लवाजमा असताना मुख्य रस्त्यांलगत कचरा साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. इंधनावर होणारा खर्च वाचवून स्वत:चे खिसे जड करण्याच्या प्रकारातून काही घंटागाडी चालक प्रभागातील खुल्या जागा, ओसाड जागेवर कचरा टाकून मोकळे होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गालगतचा निमवाडी परिसर, ढोर बाजार, बाळापूर रोडवरील जुना जकात नाका परिसर, प्रभाग क्रमांक आठमधील अन्नपूर्णा माता मंदिरामागील परिसराचा समावेश आहे.

५०० टनची अट कायमच!कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून किमान दैनंदिन ५०० मेट्रिक टन कचºयाची अट केंद्र शासनाने घातली आहे. लहान शहरांना केंद्राचे अनुदान मिळणार नसल्यामुळे दैनंदिन ५०० टन कचºयाची अट शिथिल करून त्याऐवजी २०० टन कचºयाचा समावेश करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लावून धरली आहे. यासंदर्भात आजपर्यंतही केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे घनकचºयाच्या मुद्यावर महापालिकेची कोंडी होत असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका