शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:50 IST

अकोला : स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे ...

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे महापालिकेने पाठ फिरविल्याची परिस्थिती आहे. घनकचºयाच्या मुद्यावर शासनाच्या भूमिकेत वेळोवेळी बदल होत असल्याने मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. यात भरीस भर मनपाचे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून पसार होत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य निरीक्षकांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१५ ते २०१७ या कालावधीत महापालिके च्या स्तरावर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कचºयाचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. शासनाचा ‘अल्टीमेटम’ कधीचाच संपुष्टात आला असला, तरी अद्यापही स्वायत्त संस्थांचे अनुदान बंद करण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कचरा विलगीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.मुख्य रस्त्यांलगत कचरा!कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीचे १६ आणि भाडेतत्त्वावर ३३ ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटागाड्यांची व्यवस्था आहे. कचºयाच्या मुद्यावर एवढा लवाजमा असताना मुख्य रस्त्यांलगत कचरा साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. इंधनावर होणारा खर्च वाचवून स्वत:चे खिसे जड करण्याच्या प्रकारातून काही घंटागाडी चालक प्रभागातील खुल्या जागा, ओसाड जागेवर कचरा टाकून मोकळे होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गालगतचा निमवाडी परिसर, ढोर बाजार, बाळापूर रोडवरील जुना जकात नाका परिसर, प्रभाग क्रमांक आठमधील अन्नपूर्णा माता मंदिरामागील परिसराचा समावेश आहे.

५०० टनची अट कायमच!कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून किमान दैनंदिन ५०० मेट्रिक टन कचºयाची अट केंद्र शासनाने घातली आहे. लहान शहरांना केंद्राचे अनुदान मिळणार नसल्यामुळे दैनंदिन ५०० टन कचºयाची अट शिथिल करून त्याऐवजी २०० टन कचºयाचा समावेश करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लावून धरली आहे. यासंदर्भात आजपर्यंतही केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे घनकचºयाच्या मुद्यावर महापालिकेची कोंडी होत असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका