शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

संचारबंदीमुळे अनेकांची कुटुंबीयांपासून ताटातूट

By atul.jaiswal | Updated: March 28, 2020 10:38 IST

अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : संचारबंदीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत. मूळ गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थिनी गत चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडत असल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बस व रेल्वेसेवासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. अकोल्यातील काही जणांचे कुटुंब बाहेरगावी गेले आहे. तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थिनींना अकोल्यात अडकून पडावे लागले आहे. ‘शुक्रवारी लोकमत चमू’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली असता, काही विद्यार्थिनी, महिला व पुरुष निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर उभे असलेले दिसले. विचारणा केली असता, कोणी बाहेरगावी गेलेल्या पत्नी व मुलांना, तर कोणी बाहेरगावी शिकत असलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी प्रशासनाकडून लिखित परवानगी घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. ऋतुजा गजानन वावगे नामक महिलेने सांगितले, की त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होती. आता ती औरंगाबाद येथील वसतिगृहात एकटी असून, तिला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धेच्या विद्यार्थिनी अडकल्या!वर्धा येथील किरण आणि काजल वासेकर या दोन विद्यार्थिनी ‘नीट’ परीक्षेच्या शिकवणी वर्गासाठी अकोला येथे आल्या होत्या. संचारबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद झाले आहेत. आता त्यांना परत घरी जायचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्या येथेच अडकून पडल्या आहेत.पत्नी व मुले बाहेरगावी अडकले!रोहन वानखडे यांना माहेरी गेलेली पत्नी व मुलांना परत आणण्यसाठी यवतमाळ येथे जायचे आहे. धीरज रंगवानी यांना जळगाव येथे तर कृष्णोरकर यांना जळगाव येथे जाणे गरजेचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.कोण घेणार जबाबदारी?दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबीयांना खासगी वाहनाद्वारे आणण्याचीही त्यांची तयारी आहे; परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलाबाळांची सुरक्षा कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना परत आणणे गरजेचे आहे. अनेकांकडून परवानगीसाठी अर्ज येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून, विभागीय आयुक्तांनी या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाकडून परवानगी मिळाली तर प्रशासनही नक्कीच परवानगी देईल.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकोला.कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आपत्कालीन वैद्यकीय कारणावरून आतापर्यंत एकालाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे. - संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस