शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संचारबंदीमुळे अनेकांची कुटुंबीयांपासून ताटातूट

By atul.jaiswal | Updated: March 28, 2020 10:38 IST

अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : संचारबंदीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत. मूळ गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थिनी गत चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडत असल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बस व रेल्वेसेवासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. अकोल्यातील काही जणांचे कुटुंब बाहेरगावी गेले आहे. तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थिनींना अकोल्यात अडकून पडावे लागले आहे. ‘शुक्रवारी लोकमत चमू’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली असता, काही विद्यार्थिनी, महिला व पुरुष निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर उभे असलेले दिसले. विचारणा केली असता, कोणी बाहेरगावी गेलेल्या पत्नी व मुलांना, तर कोणी बाहेरगावी शिकत असलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी प्रशासनाकडून लिखित परवानगी घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. ऋतुजा गजानन वावगे नामक महिलेने सांगितले, की त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होती. आता ती औरंगाबाद येथील वसतिगृहात एकटी असून, तिला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धेच्या विद्यार्थिनी अडकल्या!वर्धा येथील किरण आणि काजल वासेकर या दोन विद्यार्थिनी ‘नीट’ परीक्षेच्या शिकवणी वर्गासाठी अकोला येथे आल्या होत्या. संचारबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद झाले आहेत. आता त्यांना परत घरी जायचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्या येथेच अडकून पडल्या आहेत.पत्नी व मुले बाहेरगावी अडकले!रोहन वानखडे यांना माहेरी गेलेली पत्नी व मुलांना परत आणण्यसाठी यवतमाळ येथे जायचे आहे. धीरज रंगवानी यांना जळगाव येथे तर कृष्णोरकर यांना जळगाव येथे जाणे गरजेचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.कोण घेणार जबाबदारी?दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबीयांना खासगी वाहनाद्वारे आणण्याचीही त्यांची तयारी आहे; परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलाबाळांची सुरक्षा कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना परत आणणे गरजेचे आहे. अनेकांकडून परवानगीसाठी अर्ज येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून, विभागीय आयुक्तांनी या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाकडून परवानगी मिळाली तर प्रशासनही नक्कीच परवानगी देईल.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकोला.कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आपत्कालीन वैद्यकीय कारणावरून आतापर्यंत एकालाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे. - संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस