शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

Akola Flood :  ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:16 IST

Akola Flood: ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले.

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २३ जुलै रोजी शासनाकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामध्ये अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसह शेतजमिनीचे नुकसान तसेच घरांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय असे आहे पिकांचे नुकसान...

तालुका             क्षेत्र ( हेक्टर)

अकोला             १९०७९

बार्शिटाकळी             १८५०

अकोट             १५०

तेल्हारा             ३००

बाळापूर             १२२४६

मूर्तिजापूर             १७३

....................................................

एकूण             ३३७९८

३३४ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३४ मोठ्या व लहान दुधाळ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, पशुपालकांच्या मदतीसाठी १४ लाख १५ हजार ९५० रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचेही प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

३३० गावांतील ३७८३ कुटुंबे बाधित

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३३० गावांतील ३ हजार ७८३ कुटुंबे बाधित झाली असून, २५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.

अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

- संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाfloodपूरagricultureशेती