अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैला सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मंगळवारी मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा ग्रामपंचायतीसाठी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अकोला तालुक्यातील गुडधी येथे १, मलकापूर येथे ३, शिवर येथे १, शिवणी येथे ६, बोरगाव खुर्द १ असे १२ अर्ज दाखल करण्यात आले. आकोट तालुक्यात तीन अर्ज दाखल करण्यात आले. बाश्रीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व पातूर या तालुक्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्ह्यात ३८५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोंदणी केली. यामध्ये आकोट तालुक्यात ६९, अकोला १३४, बार्शिटाकळी २१, पातूर २२, तेल्हारा २८, मुर्तिजापूर १७, बाळापूर ९४ जणांनी नोंदणी केली.
ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्जाची प्रत उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्यांकडे सादर करावयाची आहे. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती व हमीपत्र, मालमत्ता आणि गुन्हेगारीविषयी घोषणापत्र, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, तिसरे अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शौचालय असल्याचा दाखला, पाणीपट्टी, घरपट्टी थकीत नसल्याचा दाखला इत्यादी दाखले व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र,ऑनलाइन अर्ज भरताना यातील काही प्रमाणपत्रांचा उल्लेखच नाही. त्यामुळे उमेदवार संभ्रमात आहेत. शौचालय, अपत्यप्रमाणपत्राबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अधिकार्यांकडून त्यासाठी उमेदवारांची अडवणूक होत असल्याचे प्रकार मंगळवारी घडले.