शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Akola: दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलो तरी अतिवृष्टीची भरपाई मिळेना!

By संतोष येलकर | Updated: August 26, 2023 19:48 IST

Akola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

- संतोष येलकरअकोला - अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला; मात्र नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही.

या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीची रक्कम खात्यात जमा होणार तरी कधी, याबाबतची आस नुकसान झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना लागली आहे.यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, त्यामध्ये काही भागात अतिवृष्टीदेखील झाली.तसेच नदी व नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख ६८ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १६४ कोटी १४ लाख ५० हजार ९५५ रुपये अपेक्षित मदतनिधीची मागणी गेल्या २२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; परंतू अद्याप नुकसानीची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली नसल्याने, शेती आणि पीक नुकसानीची मदत खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा जिल्हयातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

मदतीच्या प्रतीक्षेत तालुकानिहाय शेतकऱ्यांची अशी आहे संख्या !

तालुका            शेतकरीअकोला            ५९९८१अकोट             २४३१बाळा             ४४७८६बार्शीटाकळी ४२४६९मूर्तिजापूर १६१३३पातूर             ४४तेल्हारा          ३९६९६संकटे थांबेनात; शेतकरी पेचात !अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या महिनाभरापूर्वी जिल्हयात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने पिके अडचणीत सापडली असतानाच वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान आणि आता कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला. या पाश्वभूमीवर पीक नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसताना पिकांवर एका मागून एक येणारी संकटे थांबत नसल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे.

टॅग्स :Akolaअकोला