शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:43 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्यातील क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाने डॉ. एस.एन. देशमुख यांच्या नेतृत्वात टीएजी-२४, एके-१५९,  एके-२६५ व एके- ३0३ भुईमुगाचे वाण विकसित करण्यात आले आहे. सर्व वाण खरीप हंगामात भरघोस उत्पादन देणारी आहेत. एके- २६५ वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे. एके-३0३ भुईमुगाचे वाणही खरीप हंगामासाठी आहे. या भुईमुगाचा एक दाणा एक ग्रामचा आहे, हे विशेष. या वाणाची शेतकर्‍यांकडून मोठी मागणी आहे.  करडीमध्ये पीकेव्ही- पिंक व एकेएल-२0७ हे दोन वाण अलीकडेच विकसित करण्यात आले आहे. करडी पिंक या वाणाचे फूल गुलाबी आहे. हे वाण प्रसारित करण्यात आले. या वाणापासून इतर वाणापेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे ३३ टक्के तेल मिळते. सूर्यफूल-एसएस हे संकरित वाणही विकसित करण्यात आले आहे. नरनपुंसकतेवर आधारित तेलबिया संकरित वाण निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरू  आहेत. तेलबियांचे संशोधन करू नही क्षेत्र सातत्याने घसरत आहे.  विदर्भात सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न आठ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते, तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत सहा हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर आहे. 

भुईमूग संशोधन प्रकल्पाचा प्रस्तावभुईमुगावर संशोधन करण्यासाठी अखिल भारतीय संशोधन (एआयसीआरपी) प्रकल्पाचा प्रस्ताव भारतीय संशोधन परिषदेकडे कृषी विद्यापीठाने पाठविला आहे. हे केंद्र मिळाल्यास भुईमुगावर आणखी संशोधन करता येईल.

कृषी विद्यापीठाने दज्रेदार भरघोस उत्पादन देणारे तेल बियाणे वाण विकसित केले असून, शेतकर्‍यांची मागणी वाढली आहे. यावर्षी रब्बी हंगामात करडई क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.डॉ. विलास खर्चे,संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ