शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

अकोला जिल्हय़ातील ९0 हजार कुटुंब शौचालयाविना!

By admin | Updated: October 3, 2016 02:34 IST

कुटुंबस्तर संवाद अभियानार्तंंंगत २४ हजार कुटुंबांना दिल्या भेटी!

अतुल जयस्वाल अकोला, दि. 0२- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी-कुटुंबस्तर संवाद अभियानह्ण राज्यभर राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानांतर्गत जिल्हय़ातील सात तालुक्यातील २४,२0६ कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत २८,0५४ कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश उद्दिष्ट गाठण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्यस्वच्छतेचा जागरह्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चालू वर्षातील शौचालयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, या कामांना गती देण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी : कुटुंबस्तर संवादह्ण अभियान राबविण्यात आले. जिल्हय़ात आकोट तालुक्यातील पळसोद या गावातून २२ ऑगस्ट रोजी जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते या अभियानास प्रारंभ करण्यात आला. गत सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुका व पंचायत स्तर समिती स्तरावर गठित करण्यात आलेल्या पथक व समित्यांद्वारे गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. लोकांना शौचालयांचे महत्त्व पटवून देऊन शौचालय उभारण्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनेची माहिती देण्यात आली. या अभियानामुळे लोकांमध्ये शौचालयांबाबत जनजागृती होऊन अनेकांनी शौचालयांचे बांधकामही केले आहे. लाखांवर कुटुंबांनी शौचालय बांधले!सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील २ लाख १२ हजार ६४१ कुटुंबांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८३३ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. अद्यापही ९0 हजार ८0८ कुटुंब शौचालयांविना असल्याने जिल्हा हगणदरीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत.