शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

अकोला जिल्हय़ातील ९0 हजार कुटुंब शौचालयाविना!

By admin | Updated: October 3, 2016 02:34 IST

कुटुंबस्तर संवाद अभियानार्तंंंगत २४ हजार कुटुंबांना दिल्या भेटी!

अतुल जयस्वाल अकोला, दि. 0२- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी-कुटुंबस्तर संवाद अभियानह्ण राज्यभर राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानांतर्गत जिल्हय़ातील सात तालुक्यातील २४,२0६ कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत २८,0५४ कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश उद्दिष्ट गाठण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्यस्वच्छतेचा जागरह्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चालू वर्षातील शौचालयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, या कामांना गती देण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी : कुटुंबस्तर संवादह्ण अभियान राबविण्यात आले. जिल्हय़ात आकोट तालुक्यातील पळसोद या गावातून २२ ऑगस्ट रोजी जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते या अभियानास प्रारंभ करण्यात आला. गत सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुका व पंचायत स्तर समिती स्तरावर गठित करण्यात आलेल्या पथक व समित्यांद्वारे गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. लोकांना शौचालयांचे महत्त्व पटवून देऊन शौचालय उभारण्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनेची माहिती देण्यात आली. या अभियानामुळे लोकांमध्ये शौचालयांबाबत जनजागृती होऊन अनेकांनी शौचालयांचे बांधकामही केले आहे. लाखांवर कुटुंबांनी शौचालय बांधले!सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील २ लाख १२ हजार ६४१ कुटुंबांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८३३ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. अद्यापही ९0 हजार ८0८ कुटुंब शौचालयांविना असल्याने जिल्हा हगणदरीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत.