शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील!

By admin | Updated: August 17, 2016 02:34 IST

ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

अकोला, दि. १६ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून, त्यासाठी संबंधित महत्त्वपूर्ण विकासकामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी काम झाले असून, अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांमुळे १५ हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २२ हजार ५00 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तसेच अभियानांतर्गत सन २0१६-१७ मध्ये जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये करण्यात आलेल्या कामांमुळे ९८४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यास २ हजार ११0 शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला असून, आतापर्यंत १ हजार २८५ शेतकर्‍यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये २२२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २७२ कामे प्रगतीपथावर असून, या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. सन २0१५ मध्ये जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्याने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८७६ शेतकर्‍यांना १२४ कोटी ८८ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयव दान अभियान तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर राबविण्यात येणार आहे. अवयव दानाचे महत्त्व ओळखून नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.