शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील!

By admin | Updated: August 17, 2016 02:34 IST

ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

अकोला, दि. १६ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून, त्यासाठी संबंधित महत्त्वपूर्ण विकासकामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी काम झाले असून, अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांमुळे १५ हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २२ हजार ५00 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तसेच अभियानांतर्गत सन २0१६-१७ मध्ये जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये करण्यात आलेल्या कामांमुळे ९८४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यास २ हजार ११0 शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला असून, आतापर्यंत १ हजार २८५ शेतकर्‍यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये २२२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २७२ कामे प्रगतीपथावर असून, या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. सन २0१५ मध्ये जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्याने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८७६ शेतकर्‍यांना १२४ कोटी ८८ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयव दान अभियान तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर राबविण्यात येणार आहे. अवयव दानाचे महत्त्व ओळखून नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.