शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील!

By admin | Updated: August 17, 2016 02:34 IST

ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

अकोला, दि. १६ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून, त्यासाठी संबंधित महत्त्वपूर्ण विकासकामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी काम झाले असून, अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांमुळे १५ हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २२ हजार ५00 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तसेच अभियानांतर्गत सन २0१६-१७ मध्ये जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये करण्यात आलेल्या कामांमुळे ९८४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यास २ हजार ११0 शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला असून, आतापर्यंत १ हजार २८५ शेतकर्‍यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये २२२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २७२ कामे प्रगतीपथावर असून, या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. सन २0१५ मध्ये जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्याने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८७६ शेतकर्‍यांना १२४ कोटी ८८ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयव दान अभियान तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर राबविण्यात येणार आहे. अवयव दानाचे महत्त्व ओळखून नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.