शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहु शेती अभियानातुन अकोला जिल्ह्याला वगळले !

By admin | Updated: May 19, 2014 21:12 IST

मागील वर्षी कोरडवाहु शेती अभियानात अकोला जिल्ह्याचा सामावेश; यावर्षी मात्र जिल्ह्याला वगळले.

अकोला : कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानावर येत्या पाच वर्षात दोन हजार कोटी खर्च केला जाणार असून, यंदा राज्यातील ४०३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील पिकाखालील क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेत होत असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला अद्यापही स्थैर्य प्राप्त होऊ शकले नाही. या क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन व कृषीपूरक उपक्रमांसाठी सहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात सातत्य टिकवता येईल व त्यामुळे स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. या उद्देशाने राज्य शासनाने गतवर्षापासून राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मणुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमासाठी येत्या पाच वर्षात २० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यातील दोन हजार कोटीची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररित्या उपलब्ध करू न देण्यात आली आहे. यंदा ४०३ गावांत हे अभियान राबविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव, पुणे, अहमदनगर,सोलापूर,सातारा,सांगली,लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली नांदेड, औरंगाबाद,जालना, बीड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील १६२ गावांचा समावेश करण्यात आला आहे; परंतु २०१३-१४ मधील या गावांचे अर्थात हे दुसरे वर्ष आहे. यावर्षीपासून नवीन प्रशासकीय परिपत्रकानुसार २०१४-१५ यावर्षासाठी राज्यातील १०८ व १३३ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे; परंतु नेमके अकोला जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. या नवीन यादीत उर्वरित गावे असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्र्रत्येकी एक गाव निवडण्यात आले होते. यामध्ये सारकिन्ही, गाजीपूर टाकळी, लामकाणी, मालठाण बु., काजीखेड, भंडारज या गावांचा समावेश होता.