शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

अकोला : आठ वर्षांत ‘रमाई’च्या केवळ ५८८ घरकुलांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:26 IST

अकोला : दारिद्रय़रेषेखालील नवबौद्धांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने लाभार्थींची थट्टा चालवल्याचे चित्र समोर आले आहे. मागील आठ वर्षांत १ हजार २२५ घरकुलांपैकी केवळ ५८८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे.

ठळक मुद्देरमाईच्या लाभार्थींचा ‘पीएम’ आवास योजनेत समावेश करण्याचा घाट?

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दारिद्रय़रेषेखालील नवबौद्धांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने लाभार्थींची थट्टा चालवल्याचे चित्र समोर आले आहे. मागील आठ वर्षांत १ हजार २२५ घरकुलांपैकी केवळ ५८८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे. २0१४ पासून मनपाच्या सत्तास्थानी असलेल्या भाजपाच्या कालावधीत २0१६-१७ ते २0१७-१८ यादरम्यान रमाई आवास योजनेंतर्गत एकाही घराचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे रमाईच्या लाभार्थींंचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पंतप्रधान आवास योजनेकडे पाहिल्या जाते. ही योजना मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला, तरी तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीत बांधकाम केल्या जाणार्‍या घरांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे ‘पीएम’ आवास योजनेची बिकट स्थिती असतानाच प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी रमाई आवास घरकुल योजनेकडेही साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. मनपा क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील नवबौद्धांना २0१0-११ मध्ये रमाई आवास घरकुल योजना मंजूर झाली. १ हजार २२५ घरकुलांपैकी पहिल्या दोन वर्षांत १२२ पैकी १00 घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत २0१४-१५ मध्ये २२६ व २0१५-१६ मध्ये ८३३ अशा एकूण १ हजार ५९ घरांना मंजुरी देण्यात आली. २७५ चौरस फूट बांधकामासाठी शासनाने दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे. बांधकामाची स्थिती पाहून लाभार्थींंच्या खात्यात ही रक्कम टप्प्या-टप्प्याने जमा क रण्याचे निर्देश आहेत. अजय लहाने यांनी मंजूर दिलेल्या १ हजार ५९ घरांपैकी ४४४ घरे पूर्ण झाली. त्यानंतर कोठे माशी शिंकली देव जाणे. २0१६-१७ ते २0१७-१८ या दोन वर्षांंच्या कालावधीत रमाई आवास योजनेंतर्गत एकाही घराच्या बांधकाला साधी सुरुवातसुद्धा होऊ शकली नाही, हे येथे उल्लेखनीय. रमाई आवास योजनेला प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी अचानक ‘खो’ दिल्यामुळे हा सर्व खटाटोप पंतप्रधान आवास योजनेसाठी सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

लाभार्थींंकडूनही विलंबघरकुल मंजूर झाल्यानंतर दोन लाख रुपयांची रक्कम लाभार्थींंच्या खात्यात टप्प्या-टप्प्यात जमा होते. ‘प्लिन्थ’पर्यंंत बांधकाम केल्यानंतर दुसरा टप्पा मंजूर होतो. त्यानंतर मात्र बांधकामाची गती धिमी होते. प्रशासनाने याची कारणमीमांसा केली असता, अनेक लाभार्थींंकडून दुसर्‍या-तिसर्‍या टप्प्यातील अनुदानाची रक्कम खासगी कामांवर खर्च झाल्याचे लक्षात आले. जोपर्यंंत ही रक्कम जमा करून संबंधित लाभार्थी बांधकामाला सुरुवात करीत नाही, तोपर्यंंत प्रशासनाला उर्वरित टप्पा मंजूर करता येत नसल्याची परिस्थिती आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर