शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

अकोला शहर झाले आता पाचपट मोठे!

By admin | Updated: August 31, 2016 02:58 IST

हद्दवाढीच्या मुद्यावर लोकप्रतिनिधी, प्रशासनाने साधला समन्वय.

आशिष गावंडे अकोला, दि. ३0: महापालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब करीत, शासनाने मंगळवारी रात्री अधिसूचना जारी केली. महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांचे भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता, अकोला शहराचा आता पाच पटीने विस्तार झाला आहे. ह्यडह्ण वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत होता. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश करीत, शासनाकडे हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सादर केला होता. या मुद्यावर लोकप्रतिनिधी कमालीचे सकारात्मक दिसून आले. शासन स्तरावरदेखील हद्दवाढीच्या हालचालींनी वेग घेतला होता. सद्यस्थितीत अकोला शहराचे क्षेत्रफळ २८ चौरस किलोमीटर आहे. हद्दवाढीत समाविष्ट २४ गावांचे क्षेत्रफळ ९६.४ चौरस किलोमीटर होते. शासनाच्या मंजुरीनंतर आता अकोला शहराच्या भौगोलिक क्षेत्रफळात तब्बल पाच पटीने वाढ होऊन एकूण क्षेत्रफळ १२४.४ चौरस किलोमीटर होणार आहे. एवढय़ा मोठय़ा क्षेत्रफळाचा महापालिका क्षेत्रात समावेश होणार असल्याने विकास कामांच्या नियोजनाची मोठी जबाबदारी मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर आली आहे.गावांमध्ये सुविधाच नाहीत! मनपा क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या गावांमध्ये प्राथमिक सुविधांची पुरती ऐशीतैशी झाली आहे. भौरद, डाबकी, शिलोडा, शिवणी, शिवापूर, मलकापूर, खडकीसह इतर गावांमध्ये चक्क आठ ते दहा फूट रुंदीचे मुख्य रस्ते आहेत. अरुंद रस्ते, ले-आऊट नसल्याने सांडपाण्याची समस्या व प्रामुख्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामसेवक, सरपंचांसोबत हातमिळवणी करीत मनमानी पद्धतीने इमारती उभारल्या आहेत. काही राजकारण्यांच्या अट्टहासामुळे ग्रामीण भागात विकास कामांना ह्यब्रेकह्ण लागल्याचे चित्र आहे.हद्दवाढीची वाटचालमहापालिका क्षेत्राची हद्दवाढ करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शासनाला १ सप्टेंबरची अंतिम मुदत दिली होती. हद्दवाढीसाठी नगर विकास विभाग अनुकूल असला तरी, ग्राम विकास विभागात मात्र अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. ही बाब माहिती पडताच आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी दिवसभर मंत्रालयात ठाण मांडले. नगर विकास विभागातून आ. सावरकर यांनी दुपारी २ वाजता ग्राम विकास विभागात धाव घेतली. कक्ष अधिकारी बाबर यांच्याकडे मसुदा तयार होता. तो तातडीने उपसचिव व प्रधान सचिवांकडे पाठविला. त्यावर सायंकाळी ७ वाजता स्वाक्षरी झाल्यानंतर खा. संजय धोत्रे व आ. सावरकरांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन, अधिसूचना जारी करण्याची सूचना केली. अखेर रात्री ९ वाजता नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागाने अधिसूचना जारी केली.लोकप्रतिनिधींचे एकमतशहराच्या विकासासाठी महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचे ओळखून खा. संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर यांनीदेखील शासन स्तरावर जोरदार प्रयत्न केले. सर्वांनी पाठपुरावा केल्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या अवघ्या एक दिवस आधी हद्दवाढीची अधिसूचना जारी होऊ शकली.