शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

अकोला शहर बस वाहतूक सेवा ठप्प; सत्ताधारी सुस्त

By admin | Updated: November 24, 2014 01:31 IST

मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत.

अकोला : भंगार झालेल्या शहर बसला अपघात झाल्यास आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होईल, हा निर्णय धडकल्याने मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सिटी बस सेवा बंद केली. त्यानंतर मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत विरल्या असून, अकोल्यात येण्यास संबंधीत कंपन्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. शिवाय प्रशासनाने जारी केलेल्या निविदेकडेही पाठ फिरवण्यात आल्याने शहर बस वाहतुकीची समस्या आणखी वाढीस लागली आहे. या मुद्दय़ावर सत्तापक्षाची उदासीन भूमिका लक्षात घेता, अकोलेकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.शहर बस वाहतूक सेवेचा करार संपल्यामुळे ३ ऑगस्ट २0१४ पासून शहरातूल बस वाहतूक बंद करण्याचे पत्र बस वाहतूकदार संस्थेच्यावतीने मनपाला देण्यात आले होते. त्यावर हा करार रद्द करून नवीन गाड्यांची खरेदी करा व मनपाचे पैसे बुडवणार्‍या संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी सुनील मेश्राम, भारिपचे गजानन गवई यांनी १८ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत केली होती. भंगार झालेल्या बसला अपघात झाल्यास आयुक्त, महापौरांविरुद्ध गुन्हे दाखल होतील, ही बाब समोर येताच बस सेवा बंद करण्याचा निर्णय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. करारात नमूद असलेल २३ पैकी अवघ्या ८ शहर बस बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर, विद्यार्थ्यांंचे हाल होत आहेत. उपाय म्हणून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आठपैकी चार गाड्यांची रंगरंगोटी करून त्या रस्त्यावर आणल्या होत्या. हा प्रयोग अवघ्या आठ दिवसांतच फसला. अर्थातच, बस सेवेपासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची हमी असतानादेखील उपायुक्त चिंचोलीकरांनी सर्व गाड्या मोटार वाहन विभागात जमा केल्या. नवीन बस सेवेसाठी इच्छुकांकडून प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात निविदा सादर करीत प्रस्ताव मागवले होते. निविदेतील क्लिष्ट अर्टी व शर्ती लक्षात घेता, कोणीही निविदा सादर केली नाही. सीटी बस सेवा ठप्प पडल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.