शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

अकोला शहरात रक्ताचा तुटवडा!

By admin | Updated: May 20, 2016 01:39 IST

रक्तपेढय़ांमध्ये तीन-चार दिवस पुरेल एवढाच साठा

नितीन गव्हाळे / अकोलाअकोला: उन्हाळय़ात शरीराचे तापमानसुद्धा वाढलेले असते. रक्तदान करण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित पाहिजे. त्यामुळे उन्हाळय़ात रक्तदान करणार्‍या दात्यांची संख्या चांगलीच रोडावते. यंदाच्या उन्हाळय़ातही रक्तदानाचे प्रमाण प्रचंड घसरल्याने, शासकीयसह खासगी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. शासकीयसह खासगी रक्तपेढय़ांमध्ये तीन-चार दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढय़ांमध्ये रक्तदानाची परिस्थिती गंभीर असल्याने, रक्तपेढय़ांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. शहरातील सर्वोपचार रुग्णालय, स्त्री रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण अकोला, बुलडाणा, खामगाव, कारंजा, वाशिम, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आदी भागातून येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना रक्तपुरवठा करणार्‍या दोन शासकीयसह आठ खासगी रक्तपेढय़ा आहेत; परंतु सर्वच रक्तपेढय़ांमध्ये जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: 'निगेटिव्ह' ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढय़ा 'निगेटिव्ह' ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहे. इतर ग्रुपमध्ये 'एबी', 'ओ' व 'बी' पॉझिटिव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.