शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

Akola: अतिक्रमकांसमाेर महापालिकेचे लाेटांगण; दुसऱ्यांदा दिली मुदत, २१ ऑगस्ट पासून माेहीमेला करणार प्रारंभ

By आशीष गावंडे | Updated: August 19, 2023 19:54 IST

Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत.

- आशिष गावंडे अकोला - शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण माेहीम सुरु करण्याचा गवगवा करणाऱ्या मनपा प्रशासनाने आता नागरिकांना स्वत:हून अतिक्रमण हटविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदत दिली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वैतागलेल्या अकाेलेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांलगत रेडीमेड ड्रेस विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेता,भाजीपाला व्यावसायिक व इतर किरकाेळ साहित्य विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला आहे. यामुळे चारचाकी व दुचाकी चालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असून पादचारी अकाेलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्याची गरज असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. कंत्राटदारांची देयके तातडीने अदा करणाऱ्या प्रशासनाकडून विकास कामांची पाहणी केली जाते. दुसरीकडे अतिक्रमणाच्या समस्येचा नागरिकांना वैताग आला असताना कारवाइसाठी वरिष्ठ अधिकारी दालनात बसणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. अर्थात, सर्वसामान्यांना टॅक्सचा भरणा करण्यासाठी आग्रही असणारे प्रशासन अतिक्रमणाच्या मुद्यावर संभ्रमावस्थेत असल्यामुळे नागरिका तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

२१ ऑगस्ट पासून कारवाइला सुरुवातलघू व्यावसायिक, फेरीवाले व दुकान व्यावसायिकांनी उभारलेले अतिक्रमण स्वत:हून न हटविल्यास मनपा प्रशासनाकडून २१ ऑगस्ट पासून अतिक्रमण हटविण्याची कारवाइ केली जाणार आहे. यामध्ये पूर्व, पश्चिम, आणि उत्‍तर झोन अंतर्गत अशोक वाटीका ते पीकेव्‍ही पुल पर्यंत, नेहरू पार्क ते दुर्गाचौक, पोस्‍ट ऑफीस ते सुधीर कॉलनी पर्यंत, सिटी कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्‍ला चौक ते वाशिम बायपास, आकोट फैल परिसर, साधना चौक तसेच पालखी मार्गापर्यंतच्‍या अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.

सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभयसणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल राहते. यामुळे उद्याेग,व्यवसायाला चालना मिळत असल्याचा युक्तीवाद लघू व्यावसायिक व फेरीवाले करतात. त्यांची पाठराखण करण्यासाठी राजकीय पुढारीही समाेर येतात. परिणामी सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभय मिळत असले तरी रस्त्यातून वाट काढताना अकाेलेकरांच्या नाकीनऊ येत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला