शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तहसील कार्यालय गुल्लरघाटात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:30 IST

अकोट :  मेळघाटातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावकर्‍यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच पुनर्वसित गुल्लरघाट गावात पोहोचले. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड, मतदार नोंदणी व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थींची अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच रेशनकार्डाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट :  मेळघाटातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावकर्‍यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच पुनर्वसित गुल्लरघाट गावात पोहोचले. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड, मतदार नोंदणी व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थींची अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच रेशनकार्डाचे वितरण करण्यात आले.पुनर्वसित गावकर्‍यांनी मेळघाटात परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तसेच या गावात विविध समस्यांमुळे सुरू असलेल्या मृत्यू तांडवाचा वृत्तांत ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, प्रशासन खडबडून जागे झाले.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात असलेल्या गावांचे पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले आहे. त्यामध्ये गुल्लरघाट, अमोना, धारगड, सोमठाणा बु., सोमठाणा खुर्द, केलपाणी या सहा गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये पुनर्वसनानंतर शासनाने पाच वर्षांंत दिलेल्या आश्‍वासनानुसार सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. मेळघाटातून आणून या भागात टाकून दिल्यागत परिस्थितीमुळे कंटाळलेल्या गावकर्‍यांनी जंगलाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला होता. वातावरण व दूषित पाण्यामुळे तसेच रोजगार नसल्याने मानसिक अस्वस्थतेत असलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासन चांगलेच हादरले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्यासमवेत पुनर्वसित गुल्लरघाट या गावात पोहोचले. गावातील मंदिराच्या ओट्यावर या कार्यालयाचे कामकाज दिवसभर सुरू होते. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड नाव दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करण्यात आलीत. विशेष म्हणजे ५४ जणांची मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात आले. निराधार योजनेचा लाभ देण्याकरिता श्रावणबाळ योजनेत १८, तर संजय गांधी योजनेत दोन अर्ज भरून घेण्यात आले. हे सर्व अर्ज तहसील कार्यालयात ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्याकरिता गावकर्‍यांना त्या ठिकाणी बोलाविल्या जाणार नाही. योजनेंतर्गत थेट लाभ गावातच पोहचून देण्यात येईल, असे तहसीलदार घुगे यांनी सांगितले. तसेच तहसील कार्यालयासंबंधी काही अडचणी, समस्या असल्यास पुन्हा या गावात वारंवार तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी येऊन निराकरण करतील असे सांगण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेश गुरव, नायब तहसीलदार विजय खेडकर, मंडळ अधिकारी सायरे, ओळंबे, देशमुख, तलाठी चव्हाण, अव्वल कारकून कुळकर्णी, अंदुरकर, लिपिक खान, संगणक ऑपरेटर सिद्धांत वानखडे आदी उपस्थित होते.  काही आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाच्या अधिकार्‍यांसमोर वन विभागाविषयी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे पुनर्वसन झालेल्या गावकर्‍यांमध्ये वन विभागाने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यामुळे चांगलाच असंतोष खदखदत असल्याचे दिसून आले.  गुल्लरघाट या गावाप्रमाणेच इतरही पुनर्वसित गावात तहसील कार्यालयाने  अधिकारी- कर्मचारी जाऊन योजनांचा लाभ देणार असल्याचे तहसीलदार घुगे यांनी सांगितले.