शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात होऊ शकते इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:17 IST

अकोला : शहरातील जीर्ण व शिकस्त इमारतींची संख्या पाहता, अकोल्यातही साईदर्शन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देशिकस्त इमारतींक डे क्षेत्रीय अधिकाºयांचा कानाडोळानागरिकांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील जीर्ण व शिकस्त इमारतींची संख्या पाहता, अकोल्यातही साईदर्शन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिकस्त इमारतींमधील नागरिकांना नोटिस पाठवून महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाºयांनी औपचारिक प्रक्रिया पार पाडली असली, तरी इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलल्या जात नसल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र दिसून येते.महापालिका क्षेत्रातील जीर्ण इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. २५ जुलै रोजी मुंबईस्थित घाटकोपर येथे चार मजली साईदर्शन इमारत कोसळून १२ जणांपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला. शहरातील शिकस्त इमारतींची संख्या पाहता साईदर्शन इमारत दुर्घटनेमुळे अंगावर शहारे उभे राहतात. प्रशासनाच्यावतीने शिकस्त इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना दरवर्षी नोटिस पाठविण्याची औपचारिकता केली जाते. यावर्षीसुद्धा क्षेत्रीय अधिकाºयांनी औपचारिकता म्हणून १०८ इमारतींना नोटिस बजावल्याची माहिती आहे. मनपाच्या नोटिसला केराची टोपली दाखवत संबंधित मालमत्ताधारक इमारतीमध्ये राहणे पसंत करीत असले, तरी सदर इमारती कोणत्याही क्षणी कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिकस्त इमारतींवर कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाºयांना दिले आहेत; परंतु क्षेत्रीय अधिकारी नोटिस बजावण्यापलीकडे काहीही करीत नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अकोलेकरांचा जीव धोक्यातकाही नागरिक मागील अनेक वर्षांपासून शिकस्त इमारतींमध्ये भाडेकरू म्हणून राहतात. इमारत पाडण्याच्या सबबीखाली भाडेकरूंना बाहेर काढल्यास त्यांच्या मतानुसार मालकी हक्काचा दावा संपुष्टात येतो. अशा नागरिकांच्या हट्टापायी परिसरात राहणाºया इतरही नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.कारवाईसाठी आखडता हात का?पावसाळा आला की शहरातील शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. क्षेत्रीय अधिकाºयांना शिकस्त इमारतींमधील नागरिकांना बाहेर काढून इमारती जमीनदोस्त करण्याचे अधिकार असताना बोट नगररचना विभागाक डे दाखविल्या जाते, तर ही बाब क्षेत्रीय अधिकाºयांच्या अखत्यारीत असल्याचे सांगत नगररचना विभाग हात वर करतो. इमारत कोसळण्यापूर्वी मनपाने कारवाई केल्यास अनेकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे.शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी त्या ठिकाणी राहणे त्यांच्या स्वत:साठी व परिसरातील इतर नागरिकांसाठी धोक्याचे आहे. यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाºयांना निर्देश दिले जातील.-अजय लहाने, आयुक्त मनपा.