शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मनपाच्या नाकर्तेपणामुळेच अकाेलेकरांच्या नशिबी नरकयातना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

मनपा प्रशासनाने नालेसफाईकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न हाेता ते नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे गरिबांचे कुटुंब उघड्यावर आल्याचे ...

मनपा प्रशासनाने नालेसफाईकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न हाेता ते नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे गरिबांचे कुटुंब उघड्यावर आल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आमदार मिटकरी यांच्या निदर्शनास आणून देत जुने शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव व महसूल यंत्रणेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित हाेते. आर्थिक नुकसानीचा पंचनामा करुन ताे पुढील कार्यवाहीसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश आ.मिटकरी यांनी दिले. यावेळी प्रदेश संघटक रफिक सिद्दीकी , नगरसेविका उषा विरक, नगरसेवक नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, माजी गटनेता मनाेज गायकवाड, माजी नगरसेविका सुषमा निचळ, संतोष डाबेराव, याकूब पहेलवान आदी उपस्थित हाेते.

साथीला आळा घालण्यासाठी आराेग्य शिबीर

सखल भागातील रहिवाशांच्या आराेग्याची समस्या निर्माण हाेण्याची शक्यता पाहता नागरिकांना वैद्यकीय आराेग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. आराेग्य विभागाच्या मदतीने शनिवार व रविवारी या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आराेग्य तपासणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केले आहे.