शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

अकोला : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली असून, संभाव्य ...

अकोला : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली असून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून सज्जता करायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, डॉ. आरती कुलवाल, डॉ. दिनेश नैताम, डॉ. संगीता साने, डॉ. पटोकार आदी उपस्थित होते. कोरोना काळातही शासनाच्या कुटुंब कल्याण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे असून, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी फार मोठं काम केलं आहे, असे सांगत आता स्थिती सुधारत असली तरी उसंत न घेता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सज्जता करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सज्जता करतानाच अधिकाधिक लोकांचे कोविड लसीकरण करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने कुटुंब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी विषद केले.

कुटुंब कल्याण कार्यक्रमात आरोग्य

कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण : सीइओ

कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविताना ग्रामीण स्तरावर समुपदेशन अधिक महत्त्वाचे असून, त्यासाठी आरोग्य कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी यावेळी सांगितले.

...........................फोटो..........................