शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

अकोला : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली असून, संभाव्य ...

अकोला : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली असून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून सज्जता करायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, डॉ. आरती कुलवाल, डॉ. दिनेश नैताम, डॉ. संगीता साने, डॉ. पटोकार आदी उपस्थित होते. कोरोना काळातही शासनाच्या कुटुंब कल्याण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे असून, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी फार मोठं काम केलं आहे, असे सांगत आता स्थिती सुधारत असली तरी उसंत न घेता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सज्जता करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सज्जता करतानाच अधिकाधिक लोकांचे कोविड लसीकरण करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने कुटुंब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी विषद केले.

कुटुंब कल्याण कार्यक्रमात आरोग्य

कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण : सीइओ

कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविताना ग्रामीण स्तरावर समुपदेशन अधिक महत्त्वाचे असून, त्यासाठी आरोग्य कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी यावेळी सांगितले.

...........................फोटो..........................