शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अहल्यादेवी अन्नछत्राची दुरवस्था

By admin | Updated: June 6, 2015 00:38 IST

लोणार येथील ऐतिहासिक वास्तुकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.

मयूर गोलेच्छा / लोणार : लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास येणार्‍या भाविकांसाठी जेवणाची सुविधा होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात येथे अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. मात्र अन्नछत्रांची अत्यंत दुरावस्था झाली असून, याकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिसून येते १८ व्या शतकात २८ वर्षे रयतेच्या सुखासाठी राज्यकारभारच केला नाही तर पंचमहाभूताचे संरक्षण करण्याचे अलौकीक अजरामर असे कार्य करुन पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावे, असे अन्नदानाचे कार्य भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलीझाबेथ मार्गारेट म्हणून संबोधल्या गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी देशभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाटासह धार्मिक तीर्थक्षेत्राला जाणार्‍या भाविकांची जेवणाची सुविधा होण्यासाठी तिर्थक्षेत्रासाठी अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. इतर तिर्थक्षेत्राप्रमाणे लोणार येथेही अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात अन्नछत्राची बांधणी केली. लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास महत्व असायचे त्यामुळे मोठी गर्दी धारेवर जमायची हेच हेरुन होळकर संस्थाद्वारे लोणार येथील धारेच्या काठावर भव्य अशा अन्नछत्राची उभारणी केली. अन्नछत्रातून धारेवर स्नानासाठी येणार्‍या भाविकांसह गोरगरीबांच्या जेवणाची सुविधा झाली होती. अन्नदानाचे महत्व जाणून बांधलेल्या अन्नछत्राची पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली असून, मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. १८ व्या शतकात संपूर्ण दगडांमध्ये बांधण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या चारही बाजूने मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले. अन्नदानाचे प्रतिक असलेले अन्नछत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच अतिक्रमणामुळे अन्नछत्र पाहण्यापासून पर्यटक वंचित राहत आहेत. सन २0१0-११ मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली तत्कालीन अधिकारी पवार यांनी लाखो रुपयांची बिले काढली. मात्र आजही परिस्थिती आहे तशीच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेल्या कार्याची दखल समाजानेही घेतली नसून ऐरव्ही महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या सार्ज‍या करुन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार्‍यांना अहिल्यादेवी होळकरांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडत आहे. हेच त्यांनी बांधलेल्या अन्नछत्राच्या दुरावस्थेवरुन दिसून येते.