शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

अहल्यादेवी अन्नछत्राची दुरवस्था

By admin | Updated: June 6, 2015 00:38 IST

लोणार येथील ऐतिहासिक वास्तुकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.

मयूर गोलेच्छा / लोणार : लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास येणार्‍या भाविकांसाठी जेवणाची सुविधा होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात येथे अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. मात्र अन्नछत्रांची अत्यंत दुरावस्था झाली असून, याकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिसून येते १८ व्या शतकात २८ वर्षे रयतेच्या सुखासाठी राज्यकारभारच केला नाही तर पंचमहाभूताचे संरक्षण करण्याचे अलौकीक अजरामर असे कार्य करुन पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावे, असे अन्नदानाचे कार्य भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलीझाबेथ मार्गारेट म्हणून संबोधल्या गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी देशभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाटासह धार्मिक तीर्थक्षेत्राला जाणार्‍या भाविकांची जेवणाची सुविधा होण्यासाठी तिर्थक्षेत्रासाठी अन्नछत्रांची बांधणी करुन अन्नदानाची कायमस्वरुपी व्यवस्था केली. इतर तिर्थक्षेत्राप्रमाणे लोणार येथेही अहिल्यादेवींनी १८ व्या शतकात अन्नछत्राची बांधणी केली. लोणार येथील धारातीर्थावर प्राचीनकाळी पवित्र स्नानासाठी पंचक्रोशीतील राजे महाराजे आणि भाविकांची मोठी गर्दी असायची. धारेवरील पवित्र स्नानास महत्व असायचे त्यामुळे मोठी गर्दी धारेवर जमायची हेच हेरुन होळकर संस्थाद्वारे लोणार येथील धारेच्या काठावर भव्य अशा अन्नछत्राची उभारणी केली. अन्नछत्रातून धारेवर स्नानासाठी येणार्‍या भाविकांसह गोरगरीबांच्या जेवणाची सुविधा झाली होती. अन्नदानाचे महत्व जाणून बांधलेल्या अन्नछत्राची पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली असून, मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. १८ व्या शतकात संपूर्ण दगडांमध्ये बांधण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या चारही बाजूने मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले. अन्नदानाचे प्रतिक असलेले अन्नछत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच अतिक्रमणामुळे अन्नछत्र पाहण्यापासून पर्यटक वंचित राहत आहेत. सन २0१0-११ मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली तत्कालीन अधिकारी पवार यांनी लाखो रुपयांची बिले काढली. मात्र आजही परिस्थिती आहे तशीच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेल्या कार्याची दखल समाजानेही घेतली नसून ऐरव्ही महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या सार्ज‍या करुन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार्‍यांना अहिल्यादेवी होळकरांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडत आहे. हेच त्यांनी बांधलेल्या अन्नछत्राच्या दुरावस्थेवरुन दिसून येते.