शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी आता कृषी समाधान शिबिर!

By admin | Updated: July 15, 2017 01:37 IST

पालकमंत्र्यांची अभिनव संकल्पना : १८ व २० जुलै रोजी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तालुकानिहाय घेतलेल्या समाधान शिबिरांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्नाचा पाठपुरावा स्वत: पालकमंत्री करीत आहेत. या शिबिराांची उपयुक्तता अधोरेखित झाल्यामुळेच आता कृषी क्षेत्राच्या संदर्भाने विशेष समाधान शिबिर घेण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी हाती घेतली आहे. येत्या १८ व २० जुलै रोजी हे शिबिर होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना थोडाही त्रास होऊ नये यासाठी समाधान शिबिरांच्या धर्तीवर आता हे कृषी समाधान शिबिर होत आहेत. या शिबिरामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, निविष्ठा तसेच फळबाग, केळी उत्पादन गट, शेततळे या संदर्भातील काही तक्रारी असल्यास तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात १८ आणि २० जुलै रोजी ही शिबिरे पार पडणार आहेत़. या शिबिरामध्ये कृषी खात्याचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत़ यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर असताना त्याला आपल्या कामासाठी शासन दरबारी कोणतेही खेटे घालावे लागू नयेत, त्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली निघावेत, शासनाच्या विविध योजनांची त्याला माहिती मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शुक्रवारी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारींचा तत्काळ निपटारा होणार !मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह अकोट येथे अकोट आणि तेल्हारा तालुका तसेच १८ जुलै रोजीच दुपारी २ वाजता बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाळापूरच्या खविसं सभागृहात या शिबिराचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. गुरुवार २० जुलै रोजी सकाळी १० वाजता अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तर याच दिवशी दुपारी २ वाजता मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे़कृषीच्या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण जागेवरच करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी कार्यालयामध्ये द्याव्यात तसेच शिबिरामध्येही आपले प्रश्न मांडावेत, कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी शिबिरात उपस्थित राहतील.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री