शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

समस्या सोडविण्यासाठी आता कृषी समाधान शिबिर!

By admin | Updated: July 15, 2017 01:37 IST

पालकमंत्र्यांची अभिनव संकल्पना : १८ व २० जुलै रोजी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तालुकानिहाय घेतलेल्या समाधान शिबिरांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्नाचा पाठपुरावा स्वत: पालकमंत्री करीत आहेत. या शिबिराांची उपयुक्तता अधोरेखित झाल्यामुळेच आता कृषी क्षेत्राच्या संदर्भाने विशेष समाधान शिबिर घेण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी हाती घेतली आहे. येत्या १८ व २० जुलै रोजी हे शिबिर होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना थोडाही त्रास होऊ नये यासाठी समाधान शिबिरांच्या धर्तीवर आता हे कृषी समाधान शिबिर होत आहेत. या शिबिरामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, निविष्ठा तसेच फळबाग, केळी उत्पादन गट, शेततळे या संदर्भातील काही तक्रारी असल्यास तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात १८ आणि २० जुलै रोजी ही शिबिरे पार पडणार आहेत़. या शिबिरामध्ये कृषी खात्याचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत़ यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर असताना त्याला आपल्या कामासाठी शासन दरबारी कोणतेही खेटे घालावे लागू नयेत, त्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली निघावेत, शासनाच्या विविध योजनांची त्याला माहिती मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शुक्रवारी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारींचा तत्काळ निपटारा होणार !मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह अकोट येथे अकोट आणि तेल्हारा तालुका तसेच १८ जुलै रोजीच दुपारी २ वाजता बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाळापूरच्या खविसं सभागृहात या शिबिराचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. गुरुवार २० जुलै रोजी सकाळी १० वाजता अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तर याच दिवशी दुपारी २ वाजता मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे़कृषीच्या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण जागेवरच करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी कार्यालयामध्ये द्याव्यात तसेच शिबिरामध्येही आपले प्रश्न मांडावेत, कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी शिबिरात उपस्थित राहतील.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री