शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य उत्पादन वाढविण्यावर कृषी विद्यापींठाचा भर!

By admin | Updated: November 24, 2015 01:11 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतले संशोधन हाती.

राजरत्न सिरसाट/अकोला : हवामान बदलाचा शेती आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले असून, हवामानाला अनुकूल जाती निर्माण कराव्या लागणार आहेत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कडधान्य संशोधनावर भर दिला असून, प्रतिकूल वातावरणात तूर डाळीचे उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी प्रयोग सुरू केले आहेत. राज्यात सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम सर्वच पिकावर होत असून, कडधान्य पिकावर सर्वाधिक परिणाम होत आहे. मूग, उडीद आणि तूर या पिकांची पेरणी १५ जुलैच्या आतच होणे अपेक्षित आहे. या पिकांची पेरणी ऑगस्टपर्यंत लांबल्यास या पिकांचे ७५ टक्के उत्पादन कमी होते. मूग, उडीद हे अत्यंत संवेदशील पीक आहे. या पिकांची पेरणी जूनमध्ये केल्यासच चांगले उत्पादन होऊ शकते. तूर हे पीक दोन हंगाम अर्थात १६0 ते २00 दिवसांचे आहे. या पिकाची वेळेवर पेरणी तर हवीच शिवाय पाण्याचा ताण अधिक नसणे गरजेचे आहे. अलीकडच्या पाच वर्षांत या पिकाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचे परिणाम सरळ बाजार व बाजार दरावर दिसून आले आहेत. यावर्षी तूर नसल्याने बाजारात तुरीचे दर सध्या १0 हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले आहे. या पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून या कृषी विद्यापीठाने तुरीचे रोपे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. भाजीपाला पिकाप्रमाणे रोपे तयार करू न पाऊस आल्यानंतर ती रोपे पेरली जाणार आहेत. यासाठीचा प्रयोग सध्या राबविण्याचे ठरले आहे. उन्हाळी मूग घेता येतो; परंतु तूर हे पीक तीनही हंगामात घेणे शक्य नसल्याने या प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. फुले व स्व. वसंतराव नाईक या दोन्ही कृषी विद्यापीठाच्या वतीने हा प्रयोग राबविला जाणार आहे.