शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कडधान्य उत्पादन वाढविण्यावर कृषी विद्यापींठाचा भर!

By admin | Updated: November 24, 2015 01:11 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतले संशोधन हाती.

राजरत्न सिरसाट/अकोला : हवामान बदलाचा शेती आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले असून, हवामानाला अनुकूल जाती निर्माण कराव्या लागणार आहेत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कडधान्य संशोधनावर भर दिला असून, प्रतिकूल वातावरणात तूर डाळीचे उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी प्रयोग सुरू केले आहेत. राज्यात सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम सर्वच पिकावर होत असून, कडधान्य पिकावर सर्वाधिक परिणाम होत आहे. मूग, उडीद आणि तूर या पिकांची पेरणी १५ जुलैच्या आतच होणे अपेक्षित आहे. या पिकांची पेरणी ऑगस्टपर्यंत लांबल्यास या पिकांचे ७५ टक्के उत्पादन कमी होते. मूग, उडीद हे अत्यंत संवेदशील पीक आहे. या पिकांची पेरणी जूनमध्ये केल्यासच चांगले उत्पादन होऊ शकते. तूर हे पीक दोन हंगाम अर्थात १६0 ते २00 दिवसांचे आहे. या पिकाची वेळेवर पेरणी तर हवीच शिवाय पाण्याचा ताण अधिक नसणे गरजेचे आहे. अलीकडच्या पाच वर्षांत या पिकाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचे परिणाम सरळ बाजार व बाजार दरावर दिसून आले आहेत. यावर्षी तूर नसल्याने बाजारात तुरीचे दर सध्या १0 हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले आहे. या पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून या कृषी विद्यापीठाने तुरीचे रोपे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. भाजीपाला पिकाप्रमाणे रोपे तयार करू न पाऊस आल्यानंतर ती रोपे पेरली जाणार आहेत. यासाठीचा प्रयोग सध्या राबविण्याचे ठरले आहे. उन्हाळी मूग घेता येतो; परंतु तूर हे पीक तीनही हंगामात घेणे शक्य नसल्याने या प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. फुले व स्व. वसंतराव नाईक या दोन्ही कृषी विद्यापीठाच्या वतीने हा प्रयोग राबविला जाणार आहे.