शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

कडधान्य उत्पादन वाढविण्यावर कृषी विद्यापींठाचा भर!

By admin | Updated: November 24, 2015 01:11 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतले संशोधन हाती.

राजरत्न सिरसाट/अकोला : हवामान बदलाचा शेती आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले असून, हवामानाला अनुकूल जाती निर्माण कराव्या लागणार आहेत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कडधान्य संशोधनावर भर दिला असून, प्रतिकूल वातावरणात तूर डाळीचे उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी प्रयोग सुरू केले आहेत. राज्यात सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम सर्वच पिकावर होत असून, कडधान्य पिकावर सर्वाधिक परिणाम होत आहे. मूग, उडीद आणि तूर या पिकांची पेरणी १५ जुलैच्या आतच होणे अपेक्षित आहे. या पिकांची पेरणी ऑगस्टपर्यंत लांबल्यास या पिकांचे ७५ टक्के उत्पादन कमी होते. मूग, उडीद हे अत्यंत संवेदशील पीक आहे. या पिकांची पेरणी जूनमध्ये केल्यासच चांगले उत्पादन होऊ शकते. तूर हे पीक दोन हंगाम अर्थात १६0 ते २00 दिवसांचे आहे. या पिकाची वेळेवर पेरणी तर हवीच शिवाय पाण्याचा ताण अधिक नसणे गरजेचे आहे. अलीकडच्या पाच वर्षांत या पिकाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचे परिणाम सरळ बाजार व बाजार दरावर दिसून आले आहेत. यावर्षी तूर नसल्याने बाजारात तुरीचे दर सध्या १0 हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले आहे. या पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून या कृषी विद्यापीठाने तुरीचे रोपे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. भाजीपाला पिकाप्रमाणे रोपे तयार करू न पाऊस आल्यानंतर ती रोपे पेरली जाणार आहेत. यासाठीचा प्रयोग सध्या राबविण्याचे ठरले आहे. उन्हाळी मूग घेता येतो; परंतु तूर हे पीक तीनही हंगामात घेणे शक्य नसल्याने या प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. फुले व स्व. वसंतराव नाईक या दोन्ही कृषी विद्यापीठाच्या वतीने हा प्रयोग राबविला जाणार आहे.