शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

केंद्राने मंजुर केलेले कृषी कायदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचीच देण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे भाजपने नव्याने तयार केलेले कायदे नाहीत तर २००६ मध्ये काॅॅंग्रेसत्रराष्ट्रवादी ...

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे भाजपने नव्याने तयार केलेले कायदे नाहीत तर २००६ मध्ये काॅॅंग्रेसत्रराष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असताना त्यांच्या कार्यकाळात या कायद्यांना मूर्त रूप देण्यात आले हाेते. त्यामुळे आज या कायद्यांना विराेध करून काँग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस जनतेची दिशाभुल करत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरकार देशात हाेते. यावेळी १९ जुलै २००६ मध्ये राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सध्याच्या कृषी कायद्यांमधील सर्वच कलमांचा अंतर्भाव केलेला आहे. सध्याच्या माेदी सरकारने हाच कायदा मंजूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती खाेट्या प्रेमाचा पुळका आणून आज काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आंदाेलन करत आहे. ही सपशेल दिशाभूल असल्याचे ते म्हणाले. एनआरसीच्या विराेधात मुस्लीम समाज माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला हाेता. आज शेतकरी आंदाेलन सुरू असताना मुस्लीम समाज कुठेही नाही, असा अपप्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे हे सर्वस्वी चुकीचे आहे. देशातील मुस्लीम समाज हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे स्पष्ट करण्यासाठीच बुधवारी धरणे आंदाेलन केल्याचे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

झेंडा फडविणारा भाजपाचा कार्यकर्ता

दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपचे सरकार करत आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडविण्याचा प्रयत्न शेतकरी आंदाेलकांनी केला असा आराेप भाजपच्या गाेटातून हाेत आहे. हा आराेप सपशेल खाेटा असून झेंडा फडकविणारा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याचे नाव दीप सिद्धू असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.