शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदा शेतकरी हिताचा; विरोधकांकडून राजकारण - संजय धाेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 19:33 IST

Sanjay Dhotre News हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

अकाेला : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विराेध दर्शवित पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदाेलन छेडले. सुधारित कायद्यामुळे त्या दाेन्ही राज्यांतील गव्हाच्या खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र शासन तयार आहे. नवीन कृषी कायदा शेतकरी हिताचा असताना काही राजकीय पक्षांकडून नाहक राजकारण केले जात असून, यामुळे गरजू शेतकरी भरडला जाण्याची शक्यता असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी साेमवारी आयाेजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या धाेरणाविषयी माहिती दिली.

नवीन कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल काेणत्याही बाजारपेठेत विकता येणार आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्था भविष्यातही कायम राहणार आहे. करार शेती (काॅन्ट्रॅक्ट फार्मिंग) शेतकऱ्यांसाठी नवा विषय नाही. आज राेजी महाराष्ट्रात ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांना पेरणीसाठी येणारा खर्च व उत्पादन लक्षात घेता शेती हा व्यवसाय ताेट्यात असल्याचे दिसून येते. अशा शेतकऱ्यांसाठी करार शेती फायद्याची ठरणार असून, यामुळे त्यांच्या मालकी हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले. किमान आधारभूत किमतीच्या मुद्यावर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवला जात आहे. यापुढेही अन्नधान्याची खरेदी ‘एमएसपी’नुसारच सुरू राहणार असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. देशात विविध राज्यात करार शेतीचे कायदे यापूर्वीच अमलात आणले असून, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री धाेत्रे यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांनाे विश्वास ठेवा; बदल स्वीकारा!

मागील सहा वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने विविध याेजनांची अंमलबजावणी केली. पीएम किसान याेजना असाे वा किसान आत्मसन्मान याेजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये अनुदान दिले. यावर ९२ हजार काेटी रुपये खर्च झाले असून, ही मदत यापुढेही कायम राहील. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारला पाहिजे. त्यांची कदापिही फसगत हाेणार नाही, असे ना. संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेPoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपा