शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कृषी शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविणार -कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:03 IST

अकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. 

ठळक मुद्देकृषी विद्यापीठातर्फे डॉ.भाले यांचा सपत्नीक सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. कृषी विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित  कार्यक्रमात सत्काराला  उत्तर देताना डॉ. भाले बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी  कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर होते.  या प्रसंगी विचार मंचावर सत्कारमूर्ती डॉ. विलास भाले, त्यांच्या  सुविद्य पत्नी कीर्ती भाले, माजी कुलगुरू डॉ. गोविंदराव भराड   यांच्यासह कृषी अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेंद्र  नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण डॉ. विलास खर्चे,  सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय डॉ. ययाती तायडे,  सहयोगी अधिष्ठाता उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. प्रकाश नागरे,  विद्यापीठ नियंत्रक  विद्या पवार, विद्यापीठ अभियंता आर.पी.  खोडकुंभे, बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रमोद  लहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. भाले  यांनी शिक्षण, विस्तार, संशोधनाशी निगडित विषयावर विवेचन  करताना, सामाजिक बांधीलकी हा धर्म असला पाहिजे असे  म्हणाले. या कृषी विद्यापीठाने शेती आणि शेतकरी विकास  डोळ्य़ासमोर ठेवून आजपर्यंतचे नियोजन केले आहे. त्याचाच  परिपाक म्हणून आजवर ५0 हजारांहून अधिक कृषी  पदविकाधारक, ३0 हजार कृषी पदवीधर आणि जवळपास नऊ  हजार पदव्युत्तर, आचार्य निर्माण केले आहेत. कृषी, शेती  विकासास त्यांचा अनुकूल हातभार लागत आहे. या कृषी विद्या पीठाने आजपर्यंत  १६0 पीक वाण, १,२0७ शेती विकास,  तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. कृषी विद्या पीठाकडे सर्वांच्याच नजरा असून, येणारा काळ बघता कृषी  विद्यापीठांची जबाबदार अधिक वाढली आहे. राज्यपाल, मु ख्यमंत्री आणि  कृषिमंत्र्यांनी या  कृषी विद्यापीठाची धुरा  माझ्याकडे सोपविली आहे. आपणा सर्वांना सामूहिकरीत्या या  जबाबदारीची जाणीव ठेवून आगामी काळात एकजुटीने काम  करू न शाश्‍वत शेती विकास घडवून आणायचा आहे. कृषी  शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजवायची आहे, असा मनोदय  त्यांनी व्यक्त केले.