शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कृषिदूत पोहोचवणार शेतक-यापर्यंत कृषितंत्रज्ञान !

By admin | Updated: May 23, 2016 01:33 IST

एकीकृत कीड व्यवस्थानावर भर; डॉ. पंदेकृविने दिले प्रशिक्षण.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये कृषिदूत योजना राबविण्यात येत असून, शेतकर्‍यांना नवकृषितंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती शेतकर्‍यांना गावपातळीवर देण्यात येणार आहे. याकरिता १७0 कृषिदूतांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी प्रशिक्षण दिले. या योजनेसाठी गावातील युवकांची निवड करण्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. या पृष्ठभूमीवर रतन टाटा ट्रस्टच्यावतीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषिदूत योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचे अवलोकन करू न ते तंत्रज्ञान आपल्या गावातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात कृषिदूत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कमी खर्चाच्या शाश्‍वत तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. अशाप्रकारे कृषिदूतांनी कापूस, तूर, सोयाबीन पिकांवरील शेतकर्‍यांचा प्रतिएकरी होणारा खर्च कमी केला असून, उत्पादनवाढीसाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत. यावर्षी पश्‍चिम विदर्भातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, नेर, मोर्शी आणि धारणी या गावांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. पाच जिल्ह्यांत जवळपास २५0 कृषिदूत गावपातळीवर काम करणार आहेत. कृषिदूतांना जी गावे दिली आहेत, त्या गावांच्या शिवारातील शेतीसंदर्भात येणार्‍या अडचणी ते सोडवण्याचे प्रयत्न करणार आहेत. याबाबत ते कृषी विद्यापीठाच्या संपर्कात असतील. कृषिदूतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रक्षेत्र अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्व कृषिदूत हे मानधनावर काम करीत आहेत.