शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट!

By admin | Updated: December 24, 2014 01:20 IST

कपाशीवर लाल्या, तुरीवर किडींचा हल्ला; हरभरा किडींनी केला फस्त.

मनोज भिवगडे /अकोलानापिकी आणि कर्जबारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. अल्पशा पावसामुळे खरिपाचे पीक हातातून गेलेल्या शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांकडे आशेने बघणे सुरू केले होते, मात्र किडीने रातोरात होत्याचे नव्हते करून शेतकर्‍यांना पुन्हा अडचणीत आणले आहे. कपाशीवर लाल्या आणि तुरीवर आलेल्या किडीपाठोपाठ बोनोसेफॅलम बीटल (काळ्य़ा म्हशी) या किडींनी हरभराही फस्त केला आहे. याचा सर्वाधिक फटका खारपाणपट्टय़ातील हजारो कोरडवाहू शेतकर्‍यांना बसला आहे. यंदाच्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. १0 सप्टेंबरपासून जिल्ह्यात पिकांसाठी आवश्यक पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन पेरणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. त्यापुढील ४0 दिवस पाऊस न झाल्यामुळे रब्बीचा पेराही खोळंबला. साधारणत: १५ ऑक्टोबरच्या सुमारास रब्बीतील हरभर्‍याची पेरणी केली जाते. पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. काहींनी धाडस करून कोरड्या जमिनीतच महागडे बियाणे टाकले, मात्र तेही उगवले नाही. त्यामुळे दुबार आणि त्यानंतर तिबार पेरणी करण्याचे संकट जिल्ह्यात शेतकर्‍यांवर कोसळले. त्यातही काही शेतकर्‍यांनी डिेझल पंपाच्या मदतीने आणि टॅक्टरवर पाणी शेतात नेऊन हरभरा, तूर, कपाशी या पिकांना पाणी दिले, मात्र हवामानातील बदलानंतर या पिकांवर किडींचा प्रादरुभाव झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तुरीचा फुलोर ढगाळ वातावरणामुळे गळला, तर कपाशीचे पीक लाल्या रोगामुळे नष्ट होणार्‍या मार्गावर आहे. लाल्या रोगाचा फटका मूर्तिजापूर तालुक्यासोबतच अकोला आणि आकोट तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना बसला. खारपाणपट्टय़ातील तुरीचा फुलोर मागील आठवड्यात गळल्यामुळे म्हैसांग, अंबिकापूर, दापुरा, कट्यार, मजलापूर आदी परिसरातील तुरीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.