शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

पती निधनानंतर सावरलेल्या मातेवर पुत्रवियोगाचा डोंगर, २० वर्षांचा संघर्ष पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 18:37 IST

मोठी उमरीतील वंदना नंदागवळी यांचे पती लंकेश्वर नंदागवळी यांचे लग्नानंतर काही वर्षातच निधन झाल्यानंतर तीनही मुलांच्या पालनपोषनासह त्यांचे कुटुंबीय चालविण्यासाठी २० वर्षांपुर्वी सुरु झालेला संघर्ष आजही वंदना नंदागवळी यांचा पाठलाग करीत असल्याचे गोवा येथे घडलेल्या घटनेमूळे दिसून येत आहे.

- सचिन राऊत

अकोला : मोठी उमरीतील वंदना नंदागवळी यांचे पती लंकेश्वर नंदागवळी यांचे लग्नानंतर काही वर्षातच निधन झाल्यानंतर तीनही मुलांच्या पालनपोषनासह त्यांचे कुटुंबीय चालविण्यासाठी २० वर्षांपुर्वी सुरु झालेला संघर्ष आजही वंदना नंदागवळी यांचा पाठलाग करीत असल्याचे गोवा येथे घडलेल्या घटनेमूळे दिसून येत आहे. २० वर्षांपुर्वी पतीवर काळाने झडप घातल्यानंतर काळाने पुन्हा मुलांवर पलटवार करीत दोन पुत्र हिरावून नेल्याने वंदना नंदागवळी यांच्या जिवनापुढचे दुख वेदनेपलीकडचे आहे.

 विठ्ठल नगरातील रहिवासी लंकेश्वर व वंदना नंदागवळी या दोघांच्या संसार वेलीवर २० वर्षांपुर्वी शैलेष, प्रीतेश व चेतन या तिघांच्या रुपाने तीन कळ्या उमलल्यानंतर काळाने घात केला अन् लंकेश्वर नंदागवळी यांचे निधन झाले. कधी घराबाहेरही न गेलेल्या वंदना यांच्यावर अचानक तीन मुलांच्या पालनपोषनासह संसाराचा गाढा हाकण्याची मोठी जबाबदारी आली, जगावे की मरावे या विवंचनेत असतांनाच त्यांनी मनाशी घट्ट गाठ बांधून तीनही मुलांना मोठे करण्याचा चंग बाधला. अशातच त्यांना महावितरणमध्ये कामाची संधी मिळाली आणि २० वर्षांपासून सुरु केलेल्या संघर्षानंतर तीनही मुले कमावती झाली. यामधील शैलेष हा स्पोर्टस साहित्य विक्रीचे काम करायचा तर प्रीतेश पोलिस दलात कार्यरत झाला व चेतनचे शिक्षण सुरु होते. आईने केलेल्या २० वर्षांच्या संघर्षानंतर दोन मुलांनी आईला विश्रांती मिळावी म्हणून पुढाकार घेतला. मात्र नियतीने पुन्हा एकदा घात केला व पोलिस दलात असलेला प्रीतेश आणि शिक्षण घेत असलेला चेतन या दोघांचा गोव्यातील एका बीचवर पाण्यात बुडुन मृत्यू झाला. वंदनाबार्इंच्या संघर्षांची कहाणी एवढयावरच थांबत नाही, तर प्रीतेशची पत्नी काही महिन्यांचीच गर्भवती असल्याने आता या माउलीपुढेही उर्वरीत आयुष्य जगण्याचा व्दीधामनस्थीती निर्माण करणारा पेच तयार झाला आहे.

प्रीतेश नंदागवळी सन २००८ मध्ये अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस विभागात शिपाईपदी रुजू झाले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस परिवहन महामंडळची परीक्षा पास होऊन दयार्पूर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. तसेच काही महिन्यांपासून दयार्पूर ठाण्याच्या वाहनावर चालकपदी काम करीत असताना २ जूनपासून रजेवर असताना हा अपघात घडला.