शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

१५ तासांच्या मनधरणीनंतर ग्रामस्थ परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:04 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले.

ठळक मुद्देप्रशासनाची ग्वाही पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार! 

प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले. यामुळे तीन दिवसांपासून  तणावात असलेल्या शासकीय यंत्रणेने रविवारी रात्री १ वाज ता मोकळा श्‍वास घेतला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रातील सदर गावांचे  पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले आहे. या  गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पाण्डेय आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी  अभिजित बांगर यांनी  १0 सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री  १ वाजेपयर्ंत ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या योजना  आपल्यापयर्ंत तातडीने पुरविल्या जातील, असा दिलासा  ग्रामस्थांना दिला. अकोट तालुक्यातील पुनर्वसित  गुल्लरघाट, सोमठाणा,  धारगड, अमोना कासोद, केलपाणी  सोमठाणा लगत आणि  केलपाणी गुल्लरघाट लगत या गावांमध्ये  येत्या महिनाभरात  कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुनर्वसित गावांमध्ये  कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना अडचण भासू दिली जाणार  नाही. असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी केले आहे. 

३३५ घरकुल उभारणार! सोमवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची  बैठक घेऊन पुनर्वसित गावांमध्ये तातडीने  विविध योजनें तर्गत सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शबरी  घरकुल योजनेतंर्गत गुल्लरघाट गावात ५५ घरकुल,  सोमठाणा गावात ३५, धारगड गावात ७५, अमोना कासोद  येथे ५९, केलपाणी सोमठाणा लगत येथे ७५ आणि केल पाणी गुल्लरघाट लगत येथे  ३६, असे एकूण 335 घरकुल  बांधण्यात येणार आहेत. 

५0७ शौचायलांची निर्मितीस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुल्लरघाट गावात ७५  शौचालय,  सोमठाणा येथे १२८ शौचालय, धारगड येथे १0२  शौचालय, अमोना कासोद येथे २५ शौचालय, केलपाणी   सोमठाणा लगत येथे  १३७ शौचालय आणि केलपाणी  गुल्लरघाट लगत येथे ४0 शौचालय, असे एकूण ५0७  शौचालय बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा व अंगणवाडीची सुविधा सोमठाणा येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून,  गुल्लरघाट येथे लवकरच अंगणवाडी इमारतीचे काम सुरू  करण्यात येणार आहे. सदर गावांमध्ये पाणीपुरवठा योजने तंर्गत दोन कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री पेयजल योजनामध्ये  पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठा क्कर बप्पा योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सांडपाणी  नाल्यांच्या बांधकामासाठी ५२.५ लाख रुपयांच्या निधीस  जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्प  अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत  गावांतील नवयुवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही  दिले जाणार आहे. 

समिती गठित, मुंबईत बैठक पुनर्वसित आदिवासींवर अन्याय झाल्याची कबुली देत त्यांना  न्याय मिळवून देण्यासाठी अमोना, नागरतास, गुल्लरघाट,  केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु., धारगड, बारूखेडा  या आठ गावांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी माजी आमदार  राजकुमार पटेल, आ. सुनील देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री व  सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार  आहेत.