शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चार गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत ...

अकोला : जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३० एप्रिल रोजी दिला. त्यामुळे संबंधित गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील कुटासा व दनोरी आणि तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर व उमरी या चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी तीन नळ योजनांची विशेष दुरुस्ती व एक तात्पुरती पूरक नळ योजना अशा चार उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने संबंधित चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४५ लाख रुपयांच्या निधीतून तीन नळ योजनांची विशेष दुरुस्ती व एक तात्पुरती पूरक नळ योजना इत्यादी चार उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३० एप्रिल रोजी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.