शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

चार सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता!

By admin | Updated: April 7, 2017 01:12 IST

अकोला- अनेक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील चार छोट्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; परंतु कालव्याची तरतूद नसल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : अनेक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील चार छोट्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; परंतु काही प्रकल्पांना कालव्याची तरतूद नसल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सात वर्षांपूर्वी ६२ कोटी किंमत असलेल्या या प्रकल्पाच्या बांधकामासाठी आता २२३ कोटी खर्च करावा लागणार आहे.जिल्ह्यात शहापूर बृहत, शहापूर लपा व वाई व अन्य एका प्रकल्पाला नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधील अकोट तालुक्यातील शहापूर बृहत या लघू पाटबंधारे योजनेला तर गत पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर आता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. २७ फेब्रुवारी २००९ मध्ये या योजनेची २००१-२००२ च्या दरसूचीनुसार ६२ कोटी ७६ लाख ५८ हजार इतक्या किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती; पण त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेस सहा ते सात वर्षांचा कालावधी लोटला. या दीर्घ कालावधीत योजनेच्या दरसूचीतील बदलामुळे यात वाढ झाली, तसेच जास्त दराच्या निविदा, भूसंपादन खर्चातील वाढ, संकल्पनेतील बदल, इतर कारणे, आनुषंगिक खर्च इत्यादी कारणामुळे या योजनेची आजमितीस मूळ प्रशासकीय मान्यता किमतीच्या दहा टक्क्यांहून अधिक वाढत असल्यामुळे प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणे क्रमप्राप्त होते.या पृष्ठभूमीवर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने या योजनेच्या बांधकामासाठी २२३ कोटी ४१ लाख २३ हजार रुपये किमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये २०७ कोटी २१ लाख ६५ हजार बांधकामासाठी तर १६ कोटी १९ लाख ५८ हजार रुपये आनुषंगिक खर्चाची तरतूद आहे. या अंदाजपत्रकात २०१३-१४ या वर्षांच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाल्यास यात ७.७९ दशलक्ष घनमीटर जलसाठा संकलित होणार असून, १३८८ हेक्टरवर सिंचन होणार आहे. दरम्यान, या लघू पाटबंधारे योजनेच्या बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देताना कालव्याचा विचार केला नसल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीच सहा ते सात वर्षांचा कालावधी लागला, तर कालव्यासाठी किती लागेल, असे प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या योजनेला पाच कि.मी.चा कालवा आहे; परंतु बंद पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्यासंबंधी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बंद पाइपद्वारे सिंचनासाठी लवकरच स्वतंत्र आराखडा तयार करू न पाठविला जाणार आहे.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.