शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

खराब डाळीच्या पुरवठ्याने प्रशासनही गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:00 IST

जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

अकोला : शासनाने शेतकऱ्यांकडून ‘एफएक्यू’ दर्जाचा हरभरा घेऊन त्याची भरडाई करणाºया मुंबईतील सप्तशृंगी कंपनीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना खराब डाळीचा पुरवठा केला आहे. काही जिल्ह्यांत प्रशासनाच्या दबावामुळे डाळ वाटप झाले तरी अकोला जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, नाफेडने खरेदी केलेल्या हरभºयाची भरडाई करण्यासाठी शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्येच सप्तशृंगी कंपनीकडे काम दिले होते.अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह तूर व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलो ५५ रुपयेप्रमाणे वाटप करण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. त्यासाठी हरभरा, तुरीची उचल करणे, भरडाई करणे, तयार डाळ एक किलोच्या पाकिटात बंद करून शासकीय गोदामात पोहोचविण्याचे काम नवी मुंबईतील सप्तशृंगी कंपनीला देण्यात आले. (एनईएमएल एनसीडीईएक्स ग्रुप कंपनी)मार्फत ही नियुक्ती करण्यात आली. शेतकºयांकडून खरेदी केलेला त्या कंपनीकडे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनमधील जिल्ह्यांत डाळ पुरवठ्याचे काम आहे. या कंपनीने शासनाकडून अनेक जिल्ह्यांत खराब हरभरा डाळीचा पुरवठा झाला आहे. नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर शेतकºयांचा एफएक्यू दर्जाचेच धान्य खरेदी केले जाते. अनेक शेतकºयांना तर एफएक्यूच्या निकषात बसत नसल्याने खरेदी केंद्रावरून परत करण्याचा उद्दामपणाही केला जातो. त्या शेतकºयाच्या नफ्या-तोट्याचा विचारही केला जात नाही. त्याचवेळी सप्तशृंगी कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकारही शासन स्तरावर घडत आहे.मार्चपासून आली खराब डाळअकोला जिल्ह्यातील गोदामात मार्च २०१९ मध्ये काळसर, ओली असलेली खराब डाळ प्राप्त झाली. ती डाळ खराब असल्याचे दुकानदारांना पुरवठा झाल्यानंतर पुढे आले. डाळींच्या पाकिटात तर पीठच झाले आहे. ओल्या डाळींचे एकजीव गोळे तयार झाले आहेत. दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारक डाळ घेत नसल्याने ओरड सुरू झाली. त्यामुळे दुकानदारांनी डाळ परत करण्याचा सपाटा लावला. या प्रकाराने गोदामपाल जंगले, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी चांगलेच धास्तावले. साठ्यातील ५० ते ६० क्विंटल डाळ खराब असल्याची अधिकाºयांची माहिती आहे. त्याची जबाबदारीही निश्चित केली जात आहे.

दुकानदारांना भुर्दंडविशेष म्हणजे, खराब डाळ शिधापत्रिकाधारकांनी घेतली नाही. ती परत गोदामात आणण्याचा भुर्दंडही अनेक दुकानदारांना पडला आहे. ही प्रक्रियाही नियमबाह्यपणे राबविण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.

गत काही महिन्यांपासून सप्तशृंगी मिलर्सकडून प्राप्त डाळ खराब असणे, या प्रकाराची जबाबदारी निश्चित केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. -  बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

डाळ खराब असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. साठ्यातील खराब हरभरा डाळीचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला जाईल. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.

- योगेश जंगले, गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला